नुकत्याच बर्मिंघममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. तर अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या भारतीय महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघाने पटकावलेले हे पहिलेच पदक आहे.
यापूर्वी १९९८ मध्ये पुरुष क्रिकेट संघ राष्ट्रकुल खेळात सहभागी झाले होते. परंतु त्यांना कोणतेही पदक जिंकता आले नव्हते. याचउलट पहिल्यांदाच या खेळाचा भाग बनत महिला संघाने पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) भारतीय महिला संघाला (Indian Women Cricket Team) शुभेच्छा देताना असे काही बोलून गेला, ज्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे.
भारतीय संघाने कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwelath Games 2022) साखळी फेरीतील ३ पैकी २ सामने जिंकले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना ३ विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दमदार पुनरागमन करत भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर भारतीय संघाने बार्बाडोसला १०० धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. उपांत्य सामन्यात भारताचा आमना सामना इंग्लंडशी झाला आणि भारतीय संघाने शेवटच्या षटकात ४ धावा राखून सामना जिंकत अंतिम सामना गाठला.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९.३ षटकात १५२ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकण्याची संधी गमावली. मात्र त्यांनी रौप्य पदक जिंकले.
Congratulations to the Indian women's team for winning silver ..But they will go home disappointed as it was their game tonite ..@BCCIWomen
— Sourav Ganguly (@SGanguly99) August 7, 2022
यानंतर माजी भारतीय कर्णधार गांगुलीने महिला क्रिकेट संघाला ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाला रौप्य पदक जिंकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परंतु त्या निराश होऊन घरी परततील. कारण आज रात्री (७ ऑगस्ट) त्यांचा खेळच तितका निराश राहिला होता.”
गांगुलीने अशाप्रकारे भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनावर खरपूस टिका केल्याने चाहते त्याचा चांगलाच समाचार गेत आहेत. एका चाहत्याने गांगुलीला ट्रोल करत लिहिले आहे की, ‘भारतीय महिला संघाला अभिमान वाटला पाहिजे, त्यांनी निराश नाही झाले पाहिजे.’
तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, एक शक्तिशाली बोर्डाचा अध्यक्ष असून असा संदेश करणे बरोबर नाही.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”
सिकंदर रजाचे छातीठोक सेलिब्रेशन! शतकी खेळीच्या जोरावर संघाला मिळवून दिला विजय
ASIA CUP: निवड होऊनही ‘या’ तीन भारतीय खेळाडूंना बसावं लागणार बाकावर! वाचा काय आहे कारण