भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 2019 विश्वचषकानंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. पण तो आयपीएलच्या 13 व्या मोसमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र सध्या आयपीएलचा हा मोसम कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
पण या दरम्यान सातत्याने धोनी एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन कसे करणार याबद्दल चर्चा होत होती. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेल्या धोनीने मार्चमध्ये चेन्नई येथे नेटमध्ये सरावही केला होता. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्याला रांचीला परत जावे लागले होते. पण या सरावादरम्यान धोनी चांगल्या लयीत असल्याचे भारताचा गोलंदाज पियुष चावलाने म्हटले आहे.
चावलाला 2020 आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सने खेळाडूंच्या लिलावादरम्यान खरेदी करत संघात घेतले आहे.
आकाश चोप्राच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चावला धोनीबद्दल म्हणाला, ‘खरं सांगू, जेव्हा एखादा खेळाडू इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर परत येतो तेव्हा तो तितक्या चांगल्या लयीत नसतो. पण माही भाईने रांचीमध्ये नक्कीच काहीतरी केले होते. कारण एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतरही तो चांगल्या लयीत होता. तो सीएसकेच्या फलंदाजी सरावादरम्यान 5-6 चेंडू खेळल्यानंतर मोठे फटके खेळत होता.’
‘तो बराच काळासाठी फलंदाजी करत होता. त्यावेळी कॅम्पमध्ये काही प्रमाणातच लोक होत, त्यातील अनेकजण गोलंदाज होते. प्रत्येक फलंदाज (रैना, रायडू, धोनी) दोन-आडीच तास फलंदाजी करत होतो. त्यावेळी ते प्रत्येकजण 200-250 चेंडूंचा सामना करत होते.’
याबरोबरच चावलाने असेही सांगितले की धोनी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कर्णधार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतं, त्या गंभीर विषयावर आम्ही काही बोलणार नाही
युवराजच्या वडिलांची शिष्य, आज आहे भारताची स्टार क्रिकेटर
या मानाच्या यादीत ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल आहे ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या मागे