१९५० च्या दशकात आणि १९६० च्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये फिरकीपटू सुभाष गुप्ते यांची कारकीर्द ३२ वर्षांमध्येच संपुष्टात आली होती. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांनी गुप्ते यांना इतर फिरकीपटूंपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे म्हटले होते. गुप्ते यांच्यासाठी दिल्ली येथील इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना हा शेवटचा सामना ठरला. ३६ कसोटीत १४७ विकेट्स घेणारे गुप्ते अशा विवादात अडकले की पुन्हा त्यांना कसोटीत खेळण्याची संधीच मिळाली नाही.
संघसहकाऱ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते गुप्ते
खरं तर भारतीय संघ त्यादरम्यान दिल्लीच्या इम्पिरियल हॉटेलमध्ये राहिला होता. जिथे गुप्ते एजी कृपाल सिंग यांच्यासोबत एकाच खोलीत राहिले होते. गुप्ते यांच्यासोबत राहणाऱ्या कृपाल सिंगवर रूम रिसेप्शनिस्टला बोलावणे आणि डेटवर येण्यासाठी त्रास दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्याची तक्रार त्या रिसेप्शनिस्टने भारतीय संघाच्या मॅनेजरकडे केली. त्यानंतर सुभाष गुप्ते यांचेही नाव त्या वादात अडकले आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले.
गुप्ते यांनी बोर्डासमोर दिले होते ‘हे’ स्पष्टीकरण
हॉटेलमध्ये झालेल्या घटनेनंतर गुप्ते यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही एजी कृपाल सिंग यांना असे कृत्य करताना थांबविले का नाही. यावर गुप्ते यांनी स्पष्टपणे उत्तर दिले होते, “तो एक मोठा माणूस आहे. मी त्याला कसं काय थांबवू शकतो. त्याने सोबत ड्रिंक करण्यासाठीच म्हटले होते.” शेवटी बोर्डाने निर्णय घेतला की वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी या दोन्ही खेळाडूंचा विचार केला नाही पाहिजे. आणि त्याचवेळी गुप्ते यांची कारकीर्द संपुष्टात आली. तरीही एजी कृपाल सिंग १९६४ पर्यंत खेळत होते.
कसोटीच्या एका डावात ९ विकेट्स घेण्याचा कारनामा
१९५८ मध्ये कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात सुभाष गुप्ते यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्या डावात वेस्ट इंडिजच्या दहाच्या दहा विकेट्स ते घेऊ शकत होते. परंतु यष्टीरक्षक नरेन ताम्हाणे यांंनी लॉन्स गिब्सचा झेल सोडला होता.
भारतीय गोलंदाज: कसोटीच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी
१. अनिल कुंबळे- २६.३ षटके, ९ निर्धाव षटके, ७४ धावा, १० विकेट्स- विरुद्ध पाकिस्तान, दिल्ली- १९९९
२. जसु पटेल- ३५.५ षटके, १६ निर्धाव षटके, ६९ धावा, ९ विकेट्स- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कानपूर- १९५९
३. कपिल देव- ३०.३ षटके, ६ निर्धाव षटके, ८३ धावा, ९ विकेट्स- विरुद्ध वेस्ट इंडिज, अहमदाबाद- १९८३
४. सुभाष गुप्ते- ३४.३ षटके, ११ निर्धाव षटके, १०२ धावा, ९ विकेट्स- विरुद्ध वेस्ट इंडिज, कानपूर- १९५८
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका डावात १० विकेट्स घेणारे पहिले भारतीय गोलंदाज
सुभाष गुप्ते प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका डावात ७८ धावा देत १० विकेट्स घेणारे पहिले भारतीय गोलंदाज होते. त्यांनी १९५४- ५५ मध्ये बॉंबे (आताची मुंबई) संघाकडून खेळताना बहावलपूर इलेव्हनविरुद्ध हा कारनामा केला होता. १९५६-५७ मध्ये प्रेमांशू चॅटर्जीने २० धावा देत १० विकेट्स घेत गुप्ते यांना मागे टाकण्यात यशस्वी झाले होते
वेस्ट इंडिजमध्ये लग्न केले आणि तिथेच स्थायिक झाले
गुप्ते यांनी त्रिनिदादची महिला कॅरोलशी लग्न केले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांनी त्रिनिदाद आणि दक्षिण त्रिनिदाद संघाकडून काही प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळले.
२००२ मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…
-बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले
-अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित
ट्रेंडिंग लेख-
-टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
-आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री
–असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…