भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात पराभवाने केली. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 21 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडने या मालिकेत 1-0ने विजयी आघाडी घेतली. अशात रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघावर दबाव असेल. कारण, एका पराभवाने भारताला 3 मोठे नुकसान होऊ शकतात.
त्यातील एक म्हणजे, भारताच्या हातून टी20 मालिका गमावली जाईल. तसेच, भारत यावर्षातील पहिली मालिका पराभूत होईल. दुसरे म्हणजे, टी20 क्रमवारीत भारताचे अव्वलस्थान धोक्यात येईल आणि तिसरे म्हणजे, तिन्ही क्रिकेट प्रकारात अव्वलस्थान पटकावण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाईल.
भारतीय संघ सध्या टी20 क्रिकेट प्रकारात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंड संघापेक्षा भारत 1 गुण पुढे आहे. भारताचे 267 गुण आहेत, तर इंग्लंडचे 266 गुण आहेत. भारताने लखनऊ टी20 (Lucknow T20) सामन्यात विजय मिळवला, तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल. तसेच, मालिका विजेत्याचा निकाल अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात लागेल. मात्र, भारताला दुसरा सामना जिंकणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण, पराभव मिळाला, तर मालिका हातून निसटेल आणि टी20तील अव्वलस्थानही गमावले जाईल.
भारताला लखनऊ टी20 पराभूत झाल्यावर होतील 3 नुकसान
भारतीय संघाने दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव मिळवला, तर न्यूझीलड मालिकेत भारत 2-0ने आघाडी घेईल. या पराभवानंतर भारत आणि इंग्लंडचे एकसोबत 266 गुण होतील. मात्र, पूर्णांक गुणांच्या आधारावर भारत या पराभवानंतरही टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी राहील. मात्र, तिसरा टी20 सामनाही गमावला, तर इंग्लंड अव्वलस्थानी येईल. त्यांचे 266 गुण होतील आणि भारत 265 गुणांवर घसरून दुसऱ्या स्थानी येईल. तसेच, 2023मधील पहिली मालिकाही गमावली जाईल.
पंड्याही नेतृत्वात पहिली मालिका गमावेल
दुसरा टी20 सामना हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यासाठीही महत्त्वाचा असेल. कारण, त्याच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा टी20 मालिका गमावले. यापूर्वी पंड्याने श्रीलंका, न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. पंड्याने कर्णधार म्हणून टी20मध्ये पहिला पराभव रांची येथे पत्करला आहे. त्याने आतापर्यंत 9 टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. म्हणजे, कर्णधार पंड्यासाठीही हा सामना खूपच महत्त्वाचा असेल.
तिन्ही क्रिकेट प्रकारातील बसेल फटका
लखनऊ टी20 सामन्यात भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारात अव्वलस्थानी जाण्याची अपेक्षा संपुष्टात येईल. भारत वनडे आणि टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. जर न्यूझीलंड शेवटच्या दोन सामन्यात पराभूत झाला, तर भारताचे अव्वलस्थान कायम राहील. कसोटी क्रमवारीतही भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवरी- मार्चमध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. जर भारतीय संघ कसोटी मालिकेत 2-0ने विजयी झाला, तर कसोटीतही अव्वलस्थान पटकावेल. (team india must win game against new zealand lucknow 2nd t20 know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनचा रोहितच्या टीम इंडियाला पाठिंबा! म्हणाला, ‘सचिनलाही चॅम्पियन बनण्यासाठी 6 वर्ल्डकप खेळावे लागलेले’
‘मी खाल्लं असतं, तर त्याला उपाशी राहावे लागलं असतं’, वडिलांची हळहळ ऐकून कॅप्टन बाबरही रडला ढसाढसा