क्रिकेट खेळातील नियमांबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा काही नियमांचे कौतुक होते, तर काही नियमांवर टीका केली जाते. नुकतेच ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमांवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, यामुळे फलंदाजांना जास्त फायदा होत आहे.
अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणले आहे की, ‘वनडेत तुमच्याकडे दोन नवीन चेंडू असतात. तुम्ही नियमांना अधिक कठोर बनवले आहे. आजकाल फलंदाजांना जास्त फायदा मिळत आहे. आता तीन रिव्ह्यू देखील उपलब्ध असतात. जर सचिनच्या काळात तीन रिव्ह्यू असते, तर त्याने एक लाखापेक्षा जास्त धावा केल्या असत्या.’
याबरोबरच अख्तरने हा देखील मुद्दा मांडला की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने कठीण गोलंदाजांचा सामना केला आहे. तो म्हणाला, ‘खरंतर मला सचिनवर दया येत आहे. त्याने सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनूस विरुद्ध क्रिकेट खेळले. तो शेन वॉर्न विरुद्ध खेळला, त्यानंतर त्याने ब्रेट ली आणि शोएब अख्तरचा सामना केला. त्यानंतर त्याने त्यापुढील वेगवान गोलंदाजांच्या पिढीचाही सामना केला. त्यामुळे मी त्याला खूप चांगला फलंदाज मानतो.’
सचिन सध्यातरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ६६४ सामने खेळताना ३४३५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १०० शतके देखील केली आहेत.
अधिक वाचा – रोहित-द्रविड जोडीवर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, ‘ते दोघे भारताला…’
अख्तर पुढे म्हणाला, ‘आजकाल क्रिकेट फलंदाजांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. पूर्वी फलंदाज म्हणून देखील तुम्ही वेगवान गोलंदाजीचा आनंद घ्यायचा.’
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
अख्तरच्या या मताला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सहमती दर्शवली. ते म्हणाले, ‘जर तुम्हाला खेळात संतुलन हवे असेल, तर एका षटकात २ पेक्षा अधिक बाऊंसर असायला हवेत. मी हे यासाठी म्हणत आहे, कारण खेळात यामुळे रोमांच येईल. आपल्या काळात टी२० क्रिकेट नव्हते. वर्षात फक्त १२-१३ कसोटी सामने व्हायचे. त्यामुळे गोलंदाज फिट होते. जर तेच गोलंदाज आजच्या काळात असते, तर कसोटी क्रिकेटचा प्रकार पूर्वीसारखा नसता. पूर्वीचे गोलंदाज आजच्या काळात चांगले प्रदर्शन करतील, पण २-३ वर्षात त्यांचे पेट्रोल कमी होईल.’
रवी शास्त्री नुकतेच ३ महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर
अन् स्टिव्ह स्मिथने स्वत:वरच मीम बनवत नामकरणही केले, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टमागचा हेतू तरी काय?