---Advertisement---

तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात

On: शुक्रवार, जून 15, 2018 3:46 PM
---Advertisement---

बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशचा संघ १०९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाच्या फिरकीसमोर या संघाचे काहीही चालले नाही.

या सामन्यात अनेक नकोसे विक्रमही अफगानिस्तान संघाच्या नावावर झाले. हे विक्रम भविष्यात नक्कीच पुसण्यासाठी अफगानिस्तान प्रयत्न करेल.

१०९- संघाच्या पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या कमी धावा. यापुर्वी दक्षिण आफ्रिका पदार्पणाच्या सामन्यात ८४ धावांवर सर्वबाद झाली होती.

३६५- भारतीय संघाने पहिल्या डावात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा न करता घेतलेली सर्वात मोठी आघाडी. यापुर्वी २०१७मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेलला ३५२ धावांची आघाडी घेतली होती.

२७.५- अफगाणिस्तान हा पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी षटके खेळणारा संघ झाला आहे. यापुर्वी पदार्पणाच्या सामन्यात बांगलादेश सर्वात कमी अर्थात ४६.३ षटके खेळला होता.

१०९- ही चिन्नास्वामी स्टेडियवरील निचांकी धावसंख्या आहे. यापुर्वी आॅस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर २०१७मध्ये ११२ धावांवर बाद झाला होता.

३६५- पदार्पणाच्या सामन्यात एखाद्या संघाला मिळालेली ही सर्वोच्च आघाडी आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एकमेव कसोटी सामन्यात कमी धावसंख्येवर अफगानिस्तानने भारताला रोखले

मोहम्मद कैफचा सौम्या स्वामिनाथनला पाठींबा

माझ्या शतकामागे रशिद खानचा हात- शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment