ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेतील पहिला सामना झाल्यानंतर विराट कोहली पालकत्वाच्या रजेमुळे मायदेशात परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबद्दल विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली म्हणाला, ‘अजिंक्य रहाणेसाठी एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून एक पाऊल पुढे टाकण्याची सुवर्णसंधी आहे.’
बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामधे विराट कोहली अजिंक्य रहाणेबद्दल बोलत आहे. “बरेच वर्ष आमच्यात समज आणि आदर आहे. आम्ही सोबत खेळताना भागीदारी सुद्धा केली आहे. हे भरवसा आणि समजूतदार पणावर टिकले. जे संघासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जिंक्सने दोन सराव सामन्यात कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्याला संघाची ताकद माहित आहे आणि हे ही माहित आहे की संघाला पुढे कसे घेवून जायचे”, असे कोहली म्हणाला.
विराट कोहलीची पूर्ण प्रतिक्रिया..
कोहली म्हणाला, “ज्या प्रकारे आम्ही क्रिकेट खेळलो आहोत, ते सांघिक प्रयत्न आहेत. हा प्रयत्न आहे, असे नाही की मी योजना आखली आणि लोकांच्या समोर ठेवली. संपूर्ण संघाने मिळून ती अमलात आणली. आम्हाला खेळाची रचना माहीत आहे आणि हे पण जाणतो की संघाला पुढे कसे घेवून जायचे. आम्ही दोघे सारख्याच पानावर आहे आणि मला भरोसा आहे की माझ्या अनुपस्थित तो संघासाठी दमदार कार्य करेल.”
विराट कोहली हे ही म्हणाला की,”ही तिच वेळ आहे, जेव्हा अजिंक्य रहाणेला एक पाऊल पुढे जाऊन व्यक्तिगत कामगिरी चांगली करून त्याबरोबर नेतृत्व सुद्धा दमदार करावे लागणार आहे. कसोटी क्रिकेटच्या परिस्थितीचा सामना करून त्यातून कणखर होवून बाहेर पडण्याचा प्रकार आहे. तुम्हाला कधी आक्रमण करायचे आणि कधी बचाव करायचा, याची माहिती असणे गरजेचे आहे.”
उल्लेखनीय म्हणजे या कसोटी मालिकेला 17 डिसेंबर पासून गुलाबी चेंडूने सुरुवात होणार आहे. पहिला सामना संपल्यानंतर विराट मायदेशी परतेल आणि अजिंक्य संघाचे नेतृत्व करेल.
संबधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– या कारणाने विराटसह रहाणेवर देखील असेल आमचा फोकस , ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने दिली प्रतिक्रिया
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रहाणेला सुखद धक्का; कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये झेप