इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार (२ सप्टेंबर) पासून सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा तो निर्णय योग्य देखील ठरला. इंग्लंडमध्ये जवळपास १ वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या ख्रिस वोक्सने या मालिकेतील आपल्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्स गेल्या अनेक काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. त्याने शेवटचा कसोटी सामना २०२० साली पाकिस्तान विरुद्ध खेळायला होता. त्यानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडच्या सॅम करन ऐवजी वोक्सला या मालिकेत संघात संधी मिळाली. या संधीत त्याने चांगलीच खेळी साधली. आपल्या भेदक गोलंदाजीने वोक्सने इंग्लंडला रोहित शर्माच्या रूपात पहिली विकेट मिळवून दिली. यासह वोक्सने या मालिकेतून कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केले.
या नंतर भारतीय संघाने या सामन्यात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले, त्यातीलच एक म्हणजे रवींद्र जडेजाचा फलंदाजीचा क्रम बदलून त्याला ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. पण, भारताचा हा डाव फारसा यशस्वी ठरला नाही. ३० व्या षटकात वोक्सने जडेजाला देखील अवघ्या १० धावांवर माघारी धाडले. यासह वोक्सने या सामन्यातील आपली दुसरी विकेट घेतली.
वोक्सने ३० व्या षटकातील टाकलेला अखेरचा चेंडू जडेजाच्या बॅटची कड घेत थेट स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या जो रुटच्या हातात गेला. रुटनेही कोणती चूक न करता चपळाईने तो चेंडू झेलला. त्याच्या या झेलाचे सध्या कौतुक होत आहे. मात्र, त्यामुळे जडेजाना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
The Wizard ????
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/PVlkIPGfI8
— England Cricket (@englandcricket) September 2, 2021
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर संघात बदल करून भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला. मात्र पहिल्या डावात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी विभाग टिकू शकला नाही.
परंतु कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. मात्र इथेही कोहली याला मोठ्या खेळीत रूपांतरीत करू शकला नाही आणि ५० च्या धावसंख्येवर ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर शार्दुल ठाकूरने ताबडतोड फलंदाजी करत ३६ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला किमान १९१ धावा उभारता आल्या.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ख्रिस वोक्सने दमदार पुनरागमन करत ४ विकेट्स घेतल्या. आली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
तसेच, भारताची फलंदाजी जरी अपयशी ठरली असली, तरी गोलंदाजांनी पहिल्या दिवशी कमाल केली आहे. भारताने इंग्लंडच्या पहिल्या दिवसाखेर ३ विकेट्स घेतल्या आहेत. यात जो रुटच्याही विकेट समावेश आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हे’ ३ विदेशी खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही संघासाठी ठरतील हुकुमी एक्के, ज्यांना मिळायला हवी एक संधी
–‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले
–ओव्हलचे मैदान दमदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय फलंदाज, शास्त्रींचाही समावेश