भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात यंदाच्या टी20 विश्वचषकातील सेमीफायनल-2 मध्ये सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यास आज (27जून) रात्री 8 वाजता सुरुवात होईल. हा सामना गयाना येथे होणार आहे. सेमीफायनल-1 मध्ये दक्षिण अफ्रिकाने अफगाणिस्तान संघाला 9 विकेटनी धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस होता. पण भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. जर सामन्यात पावसाने हजेरी लावली तर सामन्यात अडचण होऊ शकते. वास्तविक या सामन्यासाठी आयसीसीने अतिरिक्त वेळ ठेवला आहे. यासोबतच षटकांच्या कपातीबाबतचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयाना येथे खेळवले जाणार आहे. या सामन्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जर टाॅसच्या आधी पावसाने हजेरी लावली तर सामन्यास उशीरा सुरुवात होऊ शकते. महत्वाच गोष्ट म्हणजे की या सामन्यासाठी राखीव दिवस नसणार आहे. सेमीफायनल आणि फायनल दरम्यान एक दिवसाचे अंतर असल्याने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी बराच अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. पाऊस सतत पडत राहिल्यास आणि तो थांबला नाही तर 12.10 नंतर षटके कमी करण्यास सुरुवात होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाऊस पडल्यास 10-10 षटकांचा सामनाही खेळवला जाऊ शकतो. यासाठी मध्यरात्री 01.44 वाजता कट ऑफची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे नियमही घालून दिले आहेत.
जर कोणत्याही परिस्थितीत हा सामना नाही झाला. पावसामुळे रद्द झाला तर भारतीय संघाला याचा फायदा होऊ शकतो. कारण टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. जर असे झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना पहायला मिळेल.
महत्तवाच्या बातम्या-
श्रीलंकेला धक्का! जयवर्धनेच्या पाठोपाठ हेड कोच ख्रिस सिल्व्हरवुडनी दिला राजीनामा
रडारड सुरू! भारत सेमीफायनलमध्ये गेल्यामुळे वाढली इंग्लंडच्या खेळाडूची पोटदुखी, म्हणाला….
रोहितने दिलं इंझमाम-उल-हकला सडेतोड उत्तर, अर्शदीप सिंगवर केलं होतं गंभीर आरोप