पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सोमवारी (22 जुलै) रोजी स्पष्ट केले आहे की, त्यांनी भारताविरुद्ध विदेशामध्ये टी20 मालिका खेलण्यासाठी प्रस्ताव दिले नाही. पीसीबीचे सध्या संपुर्ण लक्ष्य सध्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या शिस्तबद्ध नियोजनावर आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासारख्या परदेशी टी20 मालिका खेळवण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील, अशी फक्त चर्चा होती.
तथापि, एका अहवालामध्ये मोहसीन नक्वीनी असे म्हटंले आहे की, ‘असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही कारण सध्या आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफीचे चांगले आयोजन करणे आहे आणि आमचे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रकही खूप व्यस्त आहे.’
असे मानले जात आहे की, कोलंबोमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत पीसीबीचे अध्यक्ष यांनी या दोन गोष्टींवर जोर दिला आहे. पहिला म्हणजे, चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी बजेट मंजूर करुन घेणे, दुसरे म्हणजे बीसीसीआयकडून आश्वासन घेणे की, भारत आपला संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी पाठवेल.
पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले, चॅम्पियन्स ट्राॅफी हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. ज्यामुळे भारतीय संघा विरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भारताने 2012 पासून पाकिस्तानसोबतची द्विपक्षीय मालिका थांबवली होती.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 2007 नंतर कोणतीही कसोटी मालिका खेळण्यात आलेले नाही. आणि या पुढे दोन्ही संघात कसोटी मालिका होईल अशी शक्यता वाटत नाही. अशा परिस्थितीत आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सहभागही अनिश्चित असल्याचे मानले जात आहे, कारण भारतीय संघ आपले सामने पाकिस्तानबाहेर खेळू इच्छित असल्याची अटकळ बांधली जात आहे. पाकिस्तानने आयोजित केलेल्या स्पर्धेवर टीम इंडियाने बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. टीम इंडियाने आशिया कपमध्ये आपले सामने श्रीलंकेत खेळले.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने
‘जय शाह जे म्हणतील तेच सर्व…’ चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूनी दिली प्रतिक्रिया
“सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही”…माजी खेळाडूची भविष्यवाणी; या खेळाडूचं स्थान निश्चित