तब्बल 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं पाठीवर घेत भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारत विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळणार आहे. मात्र, यापूर्वी संघाची ताकद ते उणीवांपर्यंत चर्चा सुरू आहेत. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याच्या मते, यावेळी भारताचा गोलंदाजी विभाग सर्वात मजबूत आहे. गंभीरनुसार, त्याने कधीच विचार केला नव्हता की, कोणत्याही विश्वचषकात गोलंदाजी भारताची मजबूत बाजू असेल.
विश्वचषक 2011मध्ये मिळालेल्या विश्वविजयानंतर भारताला मागील 2 विश्वचषकात उपांत्य सामन्याच्या पुढे जाता आले नाहीये. 2015मध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. तसेच, 2019मध्ये न्यूझीलंडने भारताचे आव्हान संपुष्टात आणले होते. यावेळी विश्वचषक भारतात आहे. त्यामुळे भारतासाठी हे वेगळे आव्हान असणार आहे.
गंभीरचे वक्तव्य
भारतीय संघाच्या फलंदाजांचे अलीकडील प्रदर्शन शानदार राहिले आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला होता. मात्र, गंभीरला विश्वास आहे की, यावेळी गोलंदाजी भारताची मजबूत बाजू आहे.
त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, या भारतीय संघाची सर्वात मोठी मजबूत बाजू त्यांची गोलंदाजी आहे. भारताला नेहमीच फलंदाजीसाठी ओळखले जात आले आहे. मात्र, यावेळी ज्याप्रकारचे गोलंदाज आहेत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, तर तुमच्याकडे अशाप्रकारची 30 षटके आहेत, तेव्हा तुम्ही चांगल्या स्थितीत आहात. गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतील आणि फलंदाज फक्त धावा बनवून देऊ शकतात.”
विश्वचषकात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारताने 2-1ने विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी या दोन्ही वेळी जबरदस्त प्रदर्शन केले होते. आता विश्वचषकात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (gautam gambhir on indian bowling in world cup 2023 said this read)
हेही वाचा-
बोल्टने पहिल्याच सामन्यात केला विक्रम! आतापर्यंत जगात फक्त 2 गोलंदाजांना जमलेली ‘ही’ कामगिरी
ना भारत, ना इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, ‘हा’ संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार; झहीरची भविष्यवाणी