इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पाच्या अखेररीस खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.परंतु बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांनंतर या स्पर्धेचे उर्वरित हंगाम येत्या १९ सप्टेंबर पासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत युवा रिषभ पंतला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली होती. श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. परंतु स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तो जोरदार पुनरागमन करणार आहे.(Good news for delhi capitals, Shreyas iyer is all set to return to action in after getting fit)
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “होय, एनसीएने श्रेयसला फिट असल्याची पावती दिली आहे.तो एक आठवडा बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यात आले होते. तसेच वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर तो आता सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले की,”त्याला योग्यवेळी फिट असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. कारण येत्या २ महिन्यानंतर भारतीय संघाला टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे.”
श्रेयस अय्यरने जर संघात पुनरागमन केले तर,दिल्ली कॅपिटल्स संघाचा मध्यक्रम आणखी बळकट होईल. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद रिषभ पंतकडे कायम राहील की, श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा कर्णधारपद दिले जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुखापतीमुळे झाला होता बाहेर
यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच वनडे सामन्यात श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करत असताना खांद्याला गंभीर दुखापत झाली होती.यानंतर त्याला काही महिने क्रिकेट पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.ज्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता. परंतु दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाकीबने दोन दिवसांपूर्वी टी-२०मध्ये केला मोठा कारनामा, आता ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी
“खेळाडूंच्या मेहनतीवर टीका करू नये,” कर्णधार जो रुटचा आपल्या खेळाडूंना पाठिंबा