बेंगलोर | काल (15 आॅक्टोबर) विजय हजारे ट्राॅफीतील दुसऱ्या उपांत्यपुर्व सामन्यात हैद्राबाद आणि आंध्रप्रदेश यांच्यात लढत झाली. या सामन्यात कर्णधार हनुमा विहारी शानदार 95 धावा केल्या. तरीही त्याची ही खेळी आंध्रप्रदेशला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली आहे.
हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 281 धावा बनवल्या होत्या. हैद्राबादकडून बवांका संदिपने 96 धावांची खेळी केली.
प्रत्युतरादाखल आंध्रप्रदेशच्या संघाला 50 षटकात 267 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघातून परतलेला आंध्रप्रदेशचा कर्णधार हनुमा विहारीने 99 चेंडूत 95 धावांची खेळी केली. त्याला त्याच्यासोबतच भारतीय कसोटी संघातून परतलेल्या परंतु हैद्राबादकडून गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मोहम्मद सिराजने बाद केले.
हनुमा विहारी बाद झाल्यानंतर आंध्रप्रदेशचे फलंदाज नियमीत अंतराने बाद होत गेल. त्यामुळे त्यांना 14 धावांनी पराभव स्विकारावा लागला
मोहम्मद सिराजने या सामन्यात 10 षटकांत 50 धावा देत आंध्रप्रदेशच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. हैद्राबादचा कर्णधार अंबाती रायडूने 28 धावा केल्या. हैद्राबादकडून सर्वाधिक धावा संदीप बवांकाने केल्या. त्याने 97 चेंडूत 96 धावांची अप्रतिम खेळी केली.
विजय हजारे ट्राॅफीतील उंपात्य फेरीत पहिला सामना हैद्राबाद आणि मुंबईत 17 आॅक्टोबरला होणार आहे.
उपांत्य फेरीतील दुसरा सामना दिल्ली आणि झारखंड यांच्यात 18 आॅक्टोबरला होणार आहे.
स्पर्धेतील अंतिम सामना 20 आॅक्टोबरला होणार आहे. उपांत्य फेरीतील सामने आणि अंतिम सामना बंगरूळूतील चेन्नास्वामी स्टेडियम वर होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-