जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. नजीकच्या काळात मागच्या वर्षी 2021 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ 9 मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश आल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर कसोटी संघात हार्दिक पंड्या हा पुनरागमन करू शकतो.
नवीन सायकलमध्ये बीसीसीआय कसोटी संघात अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याविषयी विचार करत असल्याचे सांगितले जातेय. या सायकलमधील पहिलीच मालिका वेस्ट इंडिजमध्ये होईल. या मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले,
“यापुढे कसोटी संघात अनेक बदल होऊ शकतात. रोहितच्या नेतृत्वावर शंका नाही तोच संघाचे कर्णधारपद सांभाळेल. सध्या हार्दिक पंड्या याला कसोटी संघात आणण्याची चर्चा सुरू आहे. तो खेळाच्या तीनही विभागात योगदान देऊ शकतो. त्याचा सध्याचा फॉर्म चांगला आहे. त्यामुळे तो कसोटीतही संघाच्या कामी येईल.”
हार्दिक मागील पाच वर्षापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. मात्र तो वनडे व टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने मागील दोन वर्षात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाला दोनदा अंतिम सामन्यात नेले आहे. तसेच त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. बीसीसीआय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान व ऋतुराज गायकवाड यांचा समावेश करू शकते.
(Hardik Pandya Might Be Include In Test Team For West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा
‘इच्छा नसताना रोहितला कसोटी कर्णधार बनवलं गेलं…’, गांगुली आणि जय शहांनी केलेला आग्रह