नवी दिल्ली| उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाथरस जिल्ह्यातील या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर तिला दिल्ली येथे उपचारासाठी आणण्यात आले होते, तेथेच तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर पीडितेला न्याय मिळावा म्हणून मागणी होत असून लोक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या वेदनादायक घटनेचे पडसात देशभरात उमटत आहेत. या घटनेबाबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महान फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी देखील ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
दोषींविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज
सुरेश रैनाने ट्विट करताना म्हटले की, “जेव्हा अशा घटना समोर येतात तेव्हा डोळ्यात पाणी येते. हाथरस येथील एका मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिचे आज निधन झाले. दोषींविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अशा घटना थांबल्याच पाहिजे. निर्भिडपणे घराबाहेर पडण्याचा महिलांना अधिकार आहे.”
It pains a lot to even hear this. A girl from UP was tortured & gang raped at #Hathras has lost her life today. We need to take strict actions against the culprits.This needs to stop NOW, our women deserve every right to go outside without any fear. #JusticeForManishaValmiki
— Suresh Raina???????? (@ImRaina) September 29, 2020
देशात काहीही बदलले नाही
हरभजन सिंग याने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आणि म्हटले की दिल्ली येथे झालेल्या निर्भया बलात्कार घटनेपासून देशात काहीही बदललेले नाही.
विराट कोहलीने केली विनंती
सध्या युएईमध्ये आयपीएल खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही घटना अमानुष आणि क्रूर असल्याचे म्हटले आहे. या वेदनादायक घटनेच्या दोषींवर कारवाई करावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी विनंती त्याने केली आहे.
What happened in #Hathras is inhumane and goes beyond cruelty. Hope the culprits of this heinous crime will be brought to justice. #JusticeForManishaValmiki
— Virat Kohli (@imVkohli) September 29, 2020
सोमवारी रात्री उशिरा पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस मंगळवारी रात्री उशिरा हाथरस येथील तिच्या गावात पोहोचले, तेथील ग्रामस्थांनी तिचा अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनीच पीडितेच्या चितेला अग्नी दिला.