केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन सिंह राठोड यांना आशा आहे की भविष्यात कबड्डी ऑलिंपिकचा भाग असेल.
सोमवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन सिंग राठोड म्हणाले की, “कबड्डी या खेळामध्ये ताकद, क्षमता आणि गती आहे आणि आता हे संपूर्ण जगाने स्वीकारले पाहिजे.”
“आशियाई क्रीडा स्पर्धेहून संघ आल्यानंतर आम्ही निश्चितपणे यात लक्ष घालू. कबड्डी महासंघात सध्या प्रशासकीय अधिकारी लक्ष घालत आहेत. तसे्च ही निवडणुक दिल्ली कोर्टाच्या आदेशानुसार प्रशासकांकडे दिली जाणार आहे. तसेच निव़णुक नव्याने घेतली जाणार आहे. आज कबड्डी हा खेळ सुमारे ३० देशांत खेळला जात आहे.”
“कबड्डी या खेळासाठी खूप कमी साधन लागतात तसेच या खेळात क्षमता, वेग, विविध कौशल्ये आणि चतुराई यांचा एकमेळ असल्यामुळे मला खात्री आहे की अशा खेळला संपूर्ण जगात स्वीकारले जाईल आणि ते अखेरीस ऑलिंपिकमध्ये दाखल होईल”. असे राठोड म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट सोबतचा फोटो शेअर करत पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत:लाच केले ट्रोल
–विराट कोहलीचे भारतीय चाहत्यांना भावनिक अावाहन