सिडनी। भारताने आज (५ मार्च) पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकात अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा कारनामा केला आहे. या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणारा पहिला उपांत्य पूर्ण सामना पावसामुळे रद्द झाला.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यानंतर भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राजने भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मिताली राजने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना ट्विट केले आहे की
भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना मिताली राज म्हणते “भारतीय संघाने महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा मला खुप आनंद होत आहे. पण त्याचवेळी एक क्रिकेटपटू म्हणून इंग्लंडच्या महिला संघासाठी वाईट वाटत आहे. मी किंवा माझा संघ अशा स्थितीत सापडलेला मला आवडणार नाही, पण नियम हे आहेत आणि ते पाळावेच लागतात. महिला संघाचे अभिनंदन. ही खूप मोठी गोष्ट आहे.”
भारतीय महिला संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला हरवून या महिला T20 विश्वचषकाची सुरूवात केली. नंतर बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला साखळी फेरीत हरवत भारतीय संघाने सर्व 8 गुण मिळवत अ गटात अव्वल क्रमांक मिळवला.
आता 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रविवारी टीम इंडियाची विश्वचषकातील साडेसाती संपणार का?
–टीम इंडियाला विश्वचषक फायनलमध्ये या खेळाडूच्या ट्विटपासून पराभवाचा धोका?
–महिला टी२० विश्वचषक: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रंगणार फायनल