दिल्ली| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी२० सामना अरूण जेटली स्टेडियमवर रंगला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आता १-०ने पुढे आहे. या मालिकेत भारतीय संघ नवखा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिल्याच सामन्यात यजमान संघावर विजय मिळवल्याने खूष झालेल्या कर्णधार टेम्बा बावुमाने पुरस्कार वितरणावेळी आनंद व्यक्त केला आहे.
“जसा वेळ जात होता तशी खेळपट्टी फलंदाजी करण्यास अधिक सोपी बनत होती. मात्र, गोलंदाजीचा अंदाज सांगता येत नव्हता. आम्हाला डावा-उजवा फलंदाजाची जोडी टिकू द्यायची नव्हती पण आमचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर भारतीय फलंदाज फिरकीपटूंवर दबाव आणत होते. फलंदाजीत आमचे प्रदर्शन चांगले राहिले. डेविड मिलरने त्याचा फॉर्म कायम ठेवत महत्वाची खेेळी केली,” असे बावुमाने म्हटले आहे.
“रस्सी वेन डर दुसेन एक चांगला फिनीशर असून आमचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याने फलंदाजीची सुरूवात संथ गतीने केली, नंतर मात्र चौकार-षटकारांचा पाऊस पाडत स्फोटक फलंदाजी केली. फलंदाजीला मिलर (David Miller) सोबत असला की रस्सीची फलंदाजी अधिक धमाकेदार होते,” असेही बावुमाने पुढे म्हटले आहे.
या सामन्यात बावुमाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशन आणि ऋतूराज गायकवाड यांनी चांगली सुरूवात केली. पहिली विकेट गेल्यावर इशानने तुफानी फलंदाजी कायम ठेवत ४८ चेंडूत ७६ धावा केल्या. श्रेयस अय्यर, पंत आणि हार्दिक पंड्या यांनीही अप्रतिम फलंदाजी केल्याने भारताने २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला क्विंटन डी कॉक आणि बावुमाने उत्तम शॉट्स मारत सुरूवात केली. पण त्यांच्या पहिल्या तीन विकेट ८१ धावांवर पडल्या. यापुढे मिलर-रस्सी या जोडीची आतिषबाजी सुरू झाली. सामनावीर ठरलेल्या मिलरने ३१ चेंडूत नाबाद ६४ आणि रस्सीने ४६ चेंडूत नाबाद ७५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतकी हिंमत!! पंतला धावबाद करण्यासाठी रबाडाची चिटिंग, भर मैदानात भारतीय कर्णधाराला दिला धक्का
मिलर-दुसेन जोडीकडून धावांचा मारा, भारतीय संघापुढे भारतातच रचली सर्वात मोठी भागीदारी
कर्णधार रोहितविना बिघडतंय टीम इंडियाचं गणित? पाहावे लागलेत सलग ‘इतके’ पराभव