वेस्ट इंडीज आणि भारत मालिकेतील हा दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) बार्बाडोसमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताचा डाव केवळ 181 धावांवर संपुष्टात आणला. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती देणे भारतीय संघाच्या अंगाशी आल्याचे दिसते.
भारतीय संघाकडून या सामन्यात दोन महत्वपूर्ण बदल करण्यात आले. नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांना विश्रांती देत संजू अक्षर पटेल यांना संधी दिली गेली. तर संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले. नाणेफेक गमावल्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मागील सामन्याप्रमाणे यावेळी देखील ईशान किशन व शुबमन गिल हे सलामीला उतरले. दोघांनी खराब चेंडूंचा योग्य समाचार घेत 90 धावांची सलामी दिली. यादरम्यान ईशानने आपले सलग दुसरे अर्धशतक साजरा केले. गिलने 34 धावा केल्या. हे दोघेही पाच धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर भारताच्या डावाची घसरण झाली. अक्षर पटेल, संजू सॅमसन व हार्दिक एकेरी धावसंख्येवर बाद झाल्यानंतर भारतीय संघ संकटात सापडला. सूर्यकुमार यादव व रवींद्र जडेजा यांनी छोटीशी भागीदारी करत संघाला दीडशे पर्यंत नेले. त्यानंतर शार्दुल ठाकूर वगळला इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी भारताचा डाव केवळ 181धावांवर संपला. वेस्ट इंडीजसाठी शेफर्ड व मोटी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
(India All Out On 181 In 2nd ODI Against West Indies Rohit And Virat Rested)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या कसोटी खेळण्यावरून दोन भारतीय दिग्गज भिडले, वाचा काय घडले
WIvsIND । विराटकडून धोनीच्या विक्रमाला तडा जाणार? यादीत रोहित सर्वोच्च स्थानी