भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात रविवारी (2 ऑक्टोबर) मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचे ठिकाण बरसापरा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium), गुवाहाटी हे आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकत भारत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यामुळे दुसरा सामना जिंकत मालिका खिशात टाकण्याचा भारताचा निर्धार असणार आहे, मात्र सामन्याआधी गुवाहाटी येथील वातावरण चाहत्यांसाठी चिंताजनक ठरले आहे. तसेच या सामन्याची सगळी तिकीटेही विकली गेली आहेत.
गुवाहाटीमधील ढगाळ वातावरणाने आयोजक आणि चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बरसापरा स्टेडियमध्ये जोरदार पावसाने मागील आंतरराष्ट्रीय सामनाही रद्द करण्यात आला होता. तर कोरोनानंतर या स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे, त्यामुळे सामन्याची तिकीटेही काही क्षणातच विकली गेली.
हवामान विभागाने मात्र भीती निर्माण केली आहे. गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाऊस जर झाला तर त्यानंतर वेळ न वाया घालवता लगेचच खेळपट्टीसाठी योग्य ती पूर्वतयारी आयोजकांनी करून ठेवली आहे. आसाम क्रिकेट संघाने अमेरिकेकडून वजनाने हलके असलेलेल पीच कव्हर मागवले आहेत
संघाचे सचिव देवाजीत यांनी म्हटले, “हे दोन्ही कव्हर आम्ही खेळपट्टी सुरक्षित राहावी जेणेकरून पाऊस झाला तर ती ओलसर राहणार नाही, यासाठी खरेदी केले आहेत.” वेदर डॉट कॉम रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी सांयकाळी पाचनंतर पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे, तर तो पाऊस रात्री 11 पर्यंत राहू शकतो.
या स्टेडियमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 5 जानेवारी 2020मध्ये खेळला गेला. तेव्हा भारत-श्रीलंका समोरासमोर आले होते आणि सततच्या पावसाने तो सामना रद्द करण्यात आला होता.
हा सामना झाला तर भारत मागील टी20 विश्वचषकानंतर खेळण्यात आलेल्या 9 पैकी 8 टी20 मालिका विजय ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेने भारतात कधीच टी20 मालिका गमावलेली नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शमीची तयारी पूर्ण! साधतोय थेट स्टंप्सवर निशाणा; पाहा व्हिडिओ
इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यूचे तांडव! शेकडो लोकांना गमवावे लागले प्राण, अनेक जखमी
दिप्ती शर्माच्या धावबाद प्रकरणामुळे पेटले ‘ट्वीटर वॉर’, हर्षा भोगलेंच्या ट्वीटला बेन स्टोक्सकडून प्रत्युत्तर