श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात युवा कर्णधार आहे. २०१८ मध्ये गौतम गंभीरनंतर त्याने दिल्ली कॅपिटल्सची सूत्रे हाती घेतली. कर्णधार म्हणून पदार्पण सामन्यात त्याने ४० चेंडूत ९३ धावांची जोरदार खेळी केली होती. तेव्हापासून अय्यरने मागे वळून पाहिले नाही.
जेव्हा त्याने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा भारतीय संघात त्याचे स्थान निश्चित नव्हते. परंतू तो सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे श्रेयस आता भारतीय संघाचा नियमित सदस्य झाला आहे. आणि त्याने निवड समितीची ४ नंबरच्या खेळाडूची समस्यादेखील मिटवली आहे.
श्रेयसचा असा विश्वास आहे की रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी कर्णधारपदाचे काम सोपे केले आहे. तो म्हणाला, “कर्णधारपद सहसा सीनिअर खेळाडूंना दिले जाते. परंतु दिल्ली कॅपिटल्सचे वातावरण काही वेगळे आहे. गेल्या वर्षीही मी आरामदायक होतो. माझ्या संघात दोन मोठे मेंदू आहेत, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग.”
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तो पुढे म्हणाला, “या वेळी मी भारतीय संघात सातत्यपूर्ण खेळाडू असल्याने मला मोठा अभिमान आहे. त्याचबरोबर अशा आश्चर्यकारक संघाचे नेतृत्व करण्याची खेळाडू म्हणूनही मोठी जबाबदारी आहे. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आहे की मी खरोखर या परिस्थितीवर प्रभुत्व मिळवू शकतो आणि त्यामुळे सर्वांची मने जिंकू शकतो.”
शिखर धवन, आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा हे अनुभवी खेळाडू असतानाही श्रेयसला कर्णधारपद देण्यात आले. हे त्याच्यासाठी आव्हान आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना श्रेयस म्हणाला, “तुम्हाला सर्वांना माहितच आहे, हे सर्व महान आणि मोठे खेळाडू आहेत. ते कशाबद्दलही तक्रार करत नाहीत. ते कोणत्याही निर्णयाच्या विरोधात कधीच जात नाहीत. मी सिनिअर आणि ज्युनिअर सर्वांशी एकसारख वागतो.”
२०१२ नंतर पहिल्यांदाच गेल्या वर्षी श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली उपांत्य फेरीत पोहोचली होती. आपल्या फलंदाजीतील बदलाविषयी तो म्हणाला की, “मी एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे, मी माझ्या फलंदाजीमार्फत अंमलात आणतो.”
दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डेनियल सॅम्स, ऍलेक्स कॅरे, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नॉर्ट्जे, रिषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल आणि अमित मिश्रा.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’
-एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना
-धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता
ट्रेंडिंग लेख-
-वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश
-आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी