दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचा फॉर्म चालू हंगामात संघासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे, असे मत माजी दिग्गज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. पंतने चालू आयपीएल हंगामातील काही सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी केली आहे, पण त्याच्या प्रदर्शनात नियमितपणा आणि आक्रमकतेचा आभाव दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते दिल्ली कॅपिटल्सला मध्यक्रमात एका चांगल्या फलंदाजाची गरज आहे. त्यांच्या मते रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रोवमन पॉवेल यांचे नियमित प्रदर्शन अद्याप येणे बाकी आहे. तसेच ललित यादववर संघ जास्त अवलंबून राहू शकत नसल्याचेही त्यांना वाटते.
माध्यमांशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “रिषभ पंतने त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन केले नाहीये आणि पॉवेलच्या फॉर्मचीही अशीच अवस्था आहे. ललित यादव फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहे, पण आपण त्याच्याकडे स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून पाहू शकत नाही. त्यांना फलंदाजी क्रमात काही मदत गरजेची आहे आणि याच कारणास्तव पंत फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे आहे. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर दोघेही चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी जर सुरुवातीच्या विकेट्स गमावल्या, तर अडचण येऊ शकते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुढे बालताना मांजरेकरांना फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचेही कौतुक केले. मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये कुलदीप यादवचे प्रदर्शन निराशाजनक राहिले होते, पण या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना त्याने जबरदस्त प्रदर्शन करून दाखवले आहे. त्याने चालू हंगामात खेळलेल्या सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेटही खूप कमी आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर संघ गुणतिलाकेत ६व्या क्रमांकावर आहे. पंतच्या नेतृत्वात संघाने खेळलेल्या सुरुवातीच्या ५ सामन्यांमधील २ जिंकले, तर ३ सामने गमावले आहेत. गुणतालिकेत त्यांच्याकडे अवघे चार गुण आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान