भारतीय संघातील चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याची निराशाजनक कामगिरी पाहता त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka) संधी मिळाल्यानंतर त्याला पुन्हा संघाबाहेर करण्यात आले होते. परंतु, येत्या काही दिवसात तो पुनरागमन करण्यासाठी आणखी जास्त जोर लावताना दिसून येणार आहे. त्याला मोठ्या स्पर्धेत एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नुकताच विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२( Vijay Hazare trophy) स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धा( Ranaji trophy) सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व कुलदीप यादवच्या हाती सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा त्याच्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी एक मोठी संधी असणार आहे.
काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो बेंगलोर स्थित नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये फलंदाजीचा कसून सराव करताना दिसून आला होता.
अधिक वाचा – कुलदीप यादवच्या कामगिरीतील घसरणीचं कारण एमएस धोनी? वाचा सविस्तर
गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. त्याने भारतीय संघासाठी आपला शेवटचा सामना श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. ज्यावेळी दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले होते.
त्याने जुलै २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच देशांतर्गत क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर, त्याच्याकडे रणजी क्रिकेट खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. याच स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघच्या अधिकाऱ्याने म्हटले की, रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी २४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमार आणि सौरभ तिवारी सारखे दिग्गज खेळाडू परतल्यानंतर, त्यांचा देखील या संघात समावेश करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या :
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
हे नक्की पाहा : हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक