क्रिकेटविश्वात एक दु:खद घटना घडली आहे. भारताचे सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रघुनाथ रामचंद्र चंदोरकर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय शंभर वर्ष होते. त्यांचा नातू आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रवण हार्दिकरने या घटनेची माहिती दिली आहे की, त्यांनी अखेरचा श्वास अंबरनाथमध्ये घेतला.
रघुनाध डाव्या हाताचे फलंदाज होते. त्यांनी एकूण ७ रणजी ट्राॅफी सामन्यांमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५५ धावा केल्या होत्या. आयुष्याचे शतक ओलांडणारे रघुनाथ हे तिसरे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते.
संख्याशास्त्रज्ञ प्रकाश दाहातोंडेंना जोपर्यंत रघुनाथचे पासपोर्ट मिळाले नव्हते. तोपर्यंत क्रिकेटविश्वात रघुनाथचा जन्म १९२२ मध्ये झाला आहे अशी चर्चा होती. मात्र, पासपोर्टवर त्याची योग्य जन्मतारीख २१ नोव्हेंबर १९२० अशी होती.
त्यांचा नातू श्रावणने सांगितले की, “माझे आजोबा सर्वात प्रिय आणि सर्वाची काळजी करणारे व्यक्ती होते. ते सर्वांसाठीच प्रेरणादायक होते. त्यांचा स्वभाव गमतीशीर होता आणि ते कोणालाही हसवू शकत होते.”
रघुनाथ यांनी १९४३ ते १९५० या काळात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्राच्या संघासाठी मुंबईविरुद्धच्या सामन्याने केली आणि कारकिर्दीचा शेवट मुंबईच्या संघासाठी महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्याने केला होता. त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात डीबी देवधर आणि वसंत कुंज हे सहकारी खेळाडू होते. योगायोग असा आहे की, हे तिघे त्यांच्या आयुष्याचे शतक पुर्ण करणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंच्या यादीचा भाग आहेत. यावर्षी झालेल्या ऍलन बर्गेस यांच्या निधनानंतर रघुनाध जगातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटर होते, जे आता या जगात नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतीय संघाकडून खेळण्याच्या लायक नाही रहाणे, आता त्याने युवकांसाठी जागा रिकामी करावी”
रोहितच्या ‘हिट शो’ पुढे अँडरसन बेजार, चौकार गेल्यानंतर असा व्यक्त केला राग; तुम्हीही पाहा
लग्नापूर्वी संजनाला गर्विष्ठ समजायचा बुमराह, मग ‘अशी’ सुरू झाली त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’