संपुर्ण नाव- श्रीनिवासराघवन वेंकटराघवन
जन्मतारिख- 21 एप्रिल, 1945
जन्मस्थळ- मद्रास (आताची- चेन्नई)
मुख्य संघ- भारत, डर्बीशायर, मद्रास आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 27 फेब्रुवारी ते 2 मार्च, 1965
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 57, धावा- 748, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 57, विकेट्स- 156, सर्वोत्तम कामगिरी- 8/72
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 15, धावा- 54, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 15, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 2/34
थोडक्यात माहिती-
-एक इंजीनिअर काय काय करु शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘श्रीनिवास वेंकटराघवन’. त्यांनी चेन्नईतील प्रसिद्ध गुंडी अण्णा अभिय़ांत्रिकी महाविद्यालयातून (College of Engineering, Guindy Anna University) इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
-पहिल्या दोन विश्वचषकात त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व तर केलेच शिवाय पुढे संघ व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय पंच, सामनाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. हे करताना त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये ज्या कशाचा अभ्यास केला असेल त्याचा नक्कीच उपयोग त्यांना कारकिर्दीत एका क्षेत्रातून दुसरीकडे स्विच होताना झाला असणार.
-1975 आणि 1979 च्या प्रुडेन्शियल विश्वचषक स्पर्धेत वेंकटराघवन हे भारतीय संघाचे कर्णधार होते. विश्वचषकात भारताचे पहिले कर्णधार म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली.
-वेंकटराघवन हे 1971च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या आणि इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे उपकर्णधार होते. त्यावेळी भारताने दोन्ही कसोटी सामन्यांच्या मालिका जिंकल्या होत्या.
-पंच म्हणून वेंकटराघवन यांनी उत्तम कामकाज केले होते. ते 73 कसोटी सामन्यात आणि 53 वनडे सामन्यात पंच होते. वेंकटराघवन हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत जे 5०हून अधिक कसोटी सामन्यात पंच राहिले आहेत.
-पंच म्हणून काम करताना त्यांनी क्वचितच चूका केल्या असतील. तसेच संघातील खेळाडूही त्यांचा आदर करत असत. याशिवाय ते बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ताही होते. तसेच त्यांची वृत्तपत्र स्तंभलेखक अशीही एक वेगळी ओळख आहे.
-वेंकटराघवन हे पंच तर होतेच. त्याचबरोबर त्यांनी 1999 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामन्यात तिसरे पंच म्हणूनही काम केले होते.
-श्रीनिवास वेंकटराघवन हे 1970 च्या दशकातील प्रसिद्ध फिरकीपटू गोलंदाज होते. परंतु, संघात बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर यांच्यांसारखे फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा दुसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर गोलंदाजीस संधी मिळत असे.
-रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (637) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी 530 विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (1560) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी 1390 विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते.
-2003 मध्ये वेंकटराघवन यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.