डिसेंबर महिन्यात भारतीय संघ वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) या दोन्ही मालिकांसाठी संघ घोषित केले. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड होण्याची अपेक्षा असलेल्या मुंबईच्या सर्फराज खान (Sarfraz Khan) याला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. मागील दोन वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचलेल्या सर्फराजला पदार्पणाचे संधी न मिळाल्याने चाहते देखील नाराज झाले आहेत.
भारतीय संघ बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेमध्ये रणजी ट्रॉफी व प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवलेल्या युवा खेळाडूंना संधी मिळेल अशी अपेक्षा केली जात होत. मात्र, निवडसमितीने या मालिकेसाठी देखील सर्व अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासूनन देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या मुंबईच्या सर्फराजला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सर्फराजने 2019-2020 च्या रणजी ट्रॉफीत 928 धावा चोपलेल्या. यावर्षी मात्र त्याचा फॉर्म आणखीनच जबरदस्त झाला. अवघ्या सहा सामन्यात त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या होत्या. यात चार शतकांचा समावेश होता. त्याने यावर्षी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी व इराणी ट्रॉफी या तीनही मानाच्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात शतके झळकावली आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी केवळ ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्याच पेक्षा कमी आहे. अशा प्रकारच्या शानदार कामगिरीनंतर त्याची भारतीय संघात निवड होत नसल्याने, चाहत्यांनी सोशल मीडियावर निवड समितीला धारेवर धरले.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय