कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. क्रिकेटचा हा जुना आणि महत्वाचा प्रकार आहे. आजही त्याला क्रिकेटविश्वात एक वेगळे स्थान आहे. मात्र क्रिकेटच्या या दीर्घ प्रकारामध्ये खेळणे प्रत्येकाला जमते हे शक्य नाही. काही क्रिकेटपटू फक्त मर्यादीत षटकांचेच सामने खेळतात. तर क्वचितच असे खेळाडू आहेत जे आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळतात. भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना दिसला आहे. मात्र मागील काही काळापासून तो कसोटीमध्ये मागे पडताना दिसत आहे. यामुळे तो हा क्रिकेट प्रकार खेळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटला उत्तम सुरूवात केल्यानंतर त्याचा फॉर्म का हरपला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. क्रिकबजच्या एका कार्यक्रमात कार्तिक बोलत होता. तो म्हणाला, “रोहितला काहीही झाले तरी कसोटी क्रिकेटमध्ये योगदान देण्याची इच्छा आहे. आम्ही दोघे जेव्हा बोलत असू तेव्हा तो नेहमी म्हणतो काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडत नाहीये. त्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असून काहींची नाही.”
रोहितच्या शॉट्स निवडीविषयी बोलताना कार्तिक म्हणाला, “तो एक किंवा दोन असे आश्चर्यचकित शॉट्स खेळतो यावरून तो कसोटीच्या फॉर्ममध्ये परतेल अशी आशा असते. मात्र तो अपेक्षेप्रमाणे कसोटीत चांगली कामगिरी करू शकला नाही. यामुळे तो फक्त मर्यादीत षटकांच्या सामन्यांत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.”
रोहितने २०१३मध्ये भारताकडून कसोटीत पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या पहिल्या दोन सामन्यात १७७ आणि १११ धावा केल्या होत्या. सुरूवात जबरदस्त केल्यानंतर तो काहीसा थंडावला. पुढील कसोटी सामन्यांमध्ये त्याच्याकडून अपेक्षेसारखी कामगिरी झाली नाही. तिसरे कसोटी शतक करण्यासाठी त्याला ४ वर्षे वाट पाहावी लागली.
सचिनची शेवटची कसोटी मालिका, तर रोहितची पहिलीच
रोहितने जेव्हा पदार्पण केले तेव्हा सचिन तेंडूलकर त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळत होता. यामुळे रोहित मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आपली जागा पक्की करेल याची अपेक्षा होती. सचिनची जागा रोहित काढेल भरून अशा नजरेने चाहतेही त्याच्याकडे पाहत होते.
रोहितने कसोटीत त्याला अधिक शतके करता आली नाही. मात्र त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४ शतके आणि वनडेत २९ शतके ठोकली आहेत.
रोहितची कसोटीतील कामगिरी
रोहित शर्माच्या तिन्ही सामन्यांची आकडेवारी पाहिली तर त्यातूनही एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे तो सर्वाधिक वनडे आणि टी२० सामनेच खेळतो. त्याने आतापर्यत ४५ कसोटी सामन्यात ४६.१३च्या सरासरीने ३१३७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ८ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहितची वनडे आणि टी२०मधील कामगिरी
तसेच रोहितने २३३ वनडे सामन्यांत ४८.५८च्या सरासरीने ९३७६ धावा केल्या आहेत. यामध्ये २९ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२०चे १३२ सामने खेळले आहेत. त्यातही त्याने ४ शतके आणि २७ अर्धशतके ठोकताना ३२.२८च्या सरासरीने ३४८७ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेतही टीम इंडियाची बल्ले-बल्ले; पहिली वनडे १० गड्यांनी खिशात
खळबळजनक! रवी शास्त्रींवर टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचे गंभीर आरोप
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच