टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर कर्णधार रोहित शर्मा एका विश्वविक्रमाची बरोबरी करेल. भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी टी20 विश्वचषकात पहिले पाकिस्तानला नंतर नेदरलॅंड्सला पराभूत केले, यामुळे रोहित हा विक्रम करण्याची अपेक्षा आहे.
विक्रम असा आहे की, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकले आहेत. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2021मध्ये अशी कामगिरी केली होती. पाकिस्तानने मागील वर्षी 20 सामने जिंकले. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने 2022मध्ये आतापर्यंत 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकले आहेत.
रोहित पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या विक्रमाची बरोबरी करू शकतो. भारताला या स्पर्धेत बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे बाकी आहे. यामुळे जर हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शक्य नाही झाले तरीही रोहित लवकरच बाबरचा विक्रम मोडू शकतो.
भारताने टी20 विश्वचषक खेळण्याआधीच घरच्या मैदानावर दोन टी20 मालिका खेळल्या. त्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकाही 2-1 याच फरकाने जिंकली.
रोहितची फलंदाजी पाहिली तर तो यंदाच्या वर्षी मागील काही सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने नेदरलॅंड्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली आणि फॉर्ममध्ये परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल सोबत संघाला उत्तम सुरूवात करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. राहुलला बाकावर बसवले जाणार नाही असे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधीच झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राहुलकडे फॉर्ममध्ये परतण्याची आणखी एक संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना जिंकून ड्रेसिंग रूममध्ये गेलेल्या बांगलादेश संघाला पंचांनी पुन्हा बोलवलं; वाचा नेमक काय घडलं
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”