---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ फलंदाज करणार पदार्पण, रणजी ट्रॉफीत झळकावलंय त्रिशतक

Indian-Cricket-Team
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात गेल्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. याच सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात रणजी क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. तो खेळाडू इतर कुणी नाही, तर श्रीकर भरत आहे.

भारतीय निवडकर्त्यांनी या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देत संघाचे संतुलन कायम राखले आहे. या सामन्यासाठी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा याच्याकडे सोपवली आहे, तर उपकर्णधारपद केएल राहुल याच्याकडे आहे. तसेच, यष्टीरक्षकाचा पर्याय म्हणून रिषभ पंतसोबतच श्रीकर भरत (Srikar Bharat) यालाही संधी दिली आहे. भरत या सामन्यातून कसोटीत पदार्पण करू शकतो.

भरतविषयी थोडक्यात
भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशासाठी खेळतो आणि तो मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी आहे. त्याच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर भरतने वयाच्या १९व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, पण २०१५मध्ये तो पहिल्यांदा चर्चेत आला, जेव्हा तो रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला. या सामन्यात त्याने गोवा संघाविरुद्ध आंध्र प्रदेशसाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली आणि ३११ चेंडूत ३०८ धावा केल्या होत्या. या दमदार खेळीनंतर तो सर्वांच्या नजरेत आला. त्याने आतापर्यंत एकूण ७९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ९ शतक आणि २३ अर्धशतकांच्या मदतीने ४२८९ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1528344105281290240

भरतची आयपीएल कारकीर्द
भरतला २०१४- १५मध्ये दिल्ली कॅपिटल्सने १० लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते, पण त्याला दिल्ली संघासाठी आयपीएलमध्ये खेळण्याची एकही संधी मिळाली नाही. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात आरसीबीने त्याला २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले. भरतने आरसीबीसाठी हंगामात महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर २०२२मध्ये पुन्हा तो दिल्लीच्या ताफ्यात गेला. पण त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला २ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने फक्त ८ धावा केल्या.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत राखीव खेळाडूंमध्ये होता भरत
भारताच्या इंग्लंड दौऱ्यात भरतला संधी दिली गेली होती. त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. तसेच, मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध भारतात पार पडलेल्या मालिकेतही भरतला भारतीय संघाच्या राखीव खेळाडूमध्ये संधी दिली गेली होती. संघात संधी मिळाली असली तरी भरत अजून भारतीय संघासाठी एकदाही खेळलेला नाही. मात्र, आता त्याला पुनर्नियोजित सामन्यासाठी संधी मिळाली आहे. आतातरी तो खेळतो की नाही, हे पाहावे लागेल. एकच कसोटी सामना आहे, त्यामुळे काहींना फक्त संघात सामील करून घेतले आहे. मात्र, सर्वांनाच खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

BREAKING : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पुनर्नियोजित कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण

‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---