पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे विश्वचषकात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. पाठीच्या स्ट्रेच फ्रॅक्चरमुळे तो सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळेच त्याच्या विश्वचषक सहभागाविषयी साशंकता आहे. मात्र, दोन दिवस बुमराह विश्वचषकातून बाहेर होणार या चर्चेला ऊत आला असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुमराह अजूनही विश्वचषकातून बाहेर झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे.
सौरव गांगुली यांना नुकताच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहच्या दुखापतीविषयी विचारले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर गेला नाही. विश्वचषक सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस अवधी आहे. आपण काही काळ थांबावे. घाईत काहीतरी वक्तव्य करणे चुकीचे ठरेल.”
जसप्रीत बुमराह याची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला चार ते सहा महिने लागतील असे बोलले जातेय.
जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सहभागी करून घेण्यात आले. तो मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या सामन्यात त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा एकदा उद्भवले. प्रथमदर्शनी तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला अशी माहिती देण्यात आली. परंतु, दुसऱ्या दिवशी त्याचे पाठीचे दुखणे गंभीर असल्याने तो संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण! विदेशी लीग खेळणार रैना
“बाबर अपयशाला घाबरतो!’; माजी भारतीय खेळाडूची खरमरीत टीका
इरफानच्या मुलालाही कळाली वडिलांची बॅटिंग, पाहा सचिनने विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाला इमरान