दक्षिण अफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज इमरान ताहिरला आगामी टी २० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात संधी मिळाली नाही. गुरुवारी ९ सप्टेंबरला दक्षिण अफ्रिकेचा टी२० विश्वचषकासाठी संघ घोषित करण्यात आला आहे. त्याला संघात संधी मिळाली नसल्यामुळे तो निराश झाल्याचे दिसते.
संघामध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिस, क्रिस माॅरिस व्यतिरिक्त ताहिरचेही नाव नव्हते. यापूर्वी दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी त्याला टी२० विश्वचषकात संधी देण्यासाठी शब्द दिला होता. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
ताहिरने इंडिपेंडेंट ऑनलाईनशी चर्चा करताना म्हटले की, स्मिथने मागच्या वर्षी मला शब्द दिला होता, त्याने तो पाळला नाही. मला चांगले वाटत नाहीये. कारण मी संघात सामील नाहीये. मागच्या वर्षी स्मिथने माझ्याशी चर्चा केली होती. तेव्हा तो म्हटला होता की, मला वाटते की तुम्ही टी २० विश्वचषक खेळावा, जो ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. मी स्पष्ट सांगितले होते की, मी या स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि तुम्ही मला जो सन्मान दिला आहे, त्यामुळे खूप उत्साहित आहे.
ताहिरने पुढे सांगितले की, मी खूप मेहनत करत आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये माझे प्रदर्शन पाहू शकता. त्यामुळेच स्मिथने मला विश्वचषक खेळायला सांगितले होते. त्यानी हे देखील सांगितले होते की ते एबी(डिविसियर्स) आणि फाफ (डू प्लेसिस) सारख्या काही अन्य खेळाडूंसोबत चर्चा करेतील. त्यांनी मला स्पर्धेत संभावितांमध्ये ठेवले, पण नंतर कोणीच माझ्याशी संपर्क केला नाही.
प्रशिक्षक मार्क बाउचरचवरही ताहिर नाराज झाला आहे. तो म्हणाला, बाउचर दक्षिण अफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर एकदाही माझ्याशी संपर्क केला नाही. पद सांभाळल्यानंतर काही महिन्यांनी मी बाउचर आणि स्मिथला मेसेज केला होता. पण दोघांपैकी कोणीच मला उत्तर दिले नाही.
बाउचर प्रशिक्षक बनले आहेत, त्यांनी मला हे सांगण्यासाठी एकदाही संपर्क केला नाही की, माझ्याविषयी भविष्यात काय योजना आहेत? ही दुख:द गोष्ट आहे. मी १० वर्ष देशाची सेवा केली. मला वाटते मी यापेक्षा जास्त सन्मानाचा हकदार आहे आणि हे लोक मला बेकार समजत आहेत.
ताहिरने २०१९ मध्ये विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. असे असले तरी, तो टी २० क्रिकेटसाठी उपलब्ध होता. तो वेगवेगळ्या टी २० लीगमध्येही खेळला आहे. त्याने ३८ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामन्यांमध्ये ६३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड संघामधील कसोटी सामना पुन्हा कधी खेळवला जाऊ शकतो? वाचा सविस्तर
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना व्हॉट्सऍपवर नक्की काय आले होते मेसेज?