बीसीसीआयने सोमवारी (८ ऑगस्ट) आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघ घोषित केला. संघ घोषित होण्यापूर्वी सांगितले जात होते की, आशिया चषकात खेळवला जाणारा संघ पुढे टी-२० विश्वचषकात जसाच्या तसा निवडला जाऊ शकतो. मात्र आता अनेकांचे मत बदलले आहे. आशिया चषकासाठी जो संघ निवडला गेला आहे, तो दुबईतील मैदानांचा विचार करून निवडल्याचे दिसत आहे.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अष्टपैलू हर्षल पटेल यांचे नाव वगळले गेले आहे. या दोघांना दुखापत झाली असून याच कारणास्तव आशिया चषकात खेळू शकणार नाहीत. असे असले तरी, आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडताना संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला यांच्या नावावर विचार करावा लगेल. बुमराह दुखपातीतून पूर्णपणे सावरल्यानंतर त्याचे संघातील स्थान पक्के असेल.
आगामी टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असून वेगवान गोलंदाजीसाठी त्याठिकाणी अनुकूल परिस्थिती असते. आशिया चषकासाठी जो संघ निवडला गेला आहे, त्यापेक्षा टी-२० विश्वचषकात भारताला जास्त वेगवान गोलंदाज गरजेचे असतील. बुमराह संघात परतल्यानतंर ही कमी भरून निघेल. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी यालाही आशिया चषकात निवडले गेले नाहीये, जो टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडताना दावेदारी मांडू शकतो. आशिया चषकात दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई आणि आवेश खान यांच्या प्रदर्शनावर संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल. टी-२० विश्वचषकासाठी संघातील स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर या खेळाडूंना आशिया चषकात चांगले प्रदर्शन करावे लागेल.
आशिया चषकात भारत कमीत कमी ५ सामने खेळेल. त्यानंतर संघाला मायदेशात ६ टी-२० सामने खेळायचे आहे. अशात या सामन्यांमध्ये जे खेळाडू स्वतःची गुणवत्ता सिद्ध करू शकतील त्यांना टी-२० विश्वचषक संघात सामील केले जाऊ शकते. तसेच जे खेळाडू खराब प्रदर्शन करतील त्यांना संघातून वगळले जाऊ शकते.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पत्नीच्या यशाने कार्तिक इमोशनल, ब्रॉन्ज मेडल विजयानंतर ‘या’ शब्दांत केला कौतुकाचा वर्षाव
INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप
रोहित कॅप्टन बनताच टीम इंडियात झाले बदल, आता पाकिस्तान येणार गोत्यात?