2022मध्ये क्रीडाविश्वात अशा बऱ्याच घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांचा भावनिक बांध तुटला. भारतात प्रत्येकवर्षी आयपीएल आणि द्विपक्षिय मालिकेत असे क्षण येतात, ज्यात चाहते गुंतून जातात. मात्र, भारतात इतक्या जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले जाते की हे क्षणांचा विसरही लवकर पडतो. मात्र, यावर्षी क्रीडाविश्वात अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे सर्व जग हैराण झाले. हे क्षण चाहते सहजासहजी लवकर विसरु शकत नाहीत. घडलेल्या या गोष्टी विजय आणि पराभवाच्या वरती होत्या. हे क्षण पाहिल्यानंतर कोणताही क्रीडाप्रेमी आपल्या भावनांवर आवर घालू शकत नाही. आपण अशाच आठवणींना उजाळा देणार आहोत.
फेडररची निवृत्ती
यावर्षी रॉजर फेडरर याने घोषणा केली होती की सप्टेंबरमध्ये तो आपला शेवटचा व्यावसायिक सामना खेळेल. टेनिस जगतात रॉजर फेडरर आणि राफेल नडाल यांच्यातील प्रतिस्पर्धा सर्वांनी पाहिली आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की हे दोघे एकाच संघाचा भाग होते आणि त्या दोघांची जोडी बनवण्यात आली होती. मात्र, त्या सामन्यात या जोडीचा पराभव झाला आणि ठरल्या प्रमाणे फेडरेरने निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने टेनिसप्रेमी भावनिक झाले होते. त्याच्या जाण्याने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नडाल याला देखील आपले अश्रू आवरता आले नाही.
ख्रिस्तियाने रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांचा अंतिम विश्वचषक
फुटबॉल विश्वात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी या दिग्गज खेळाडूंचा चाहतावर्ग अफाट आहे. जगात क्वचित असा एखादा देश असेल, ज्या देशात त्यांचा चाहता तुम्हाला आढळणार नाही. फीफा विश्वचषक 2022 हा या दोघांचा अंतिम विश्वचषक होता. मात्र, हे दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या संघांचा भाग होते. ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल देशाचे प्रतिनिधित्व करत होता, तर लिओनल मेस्सी हा अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, या दोघांपैकी एकाच दिग्गजाच्या हाती हा चषक येणार होता. शेवटी पोर्तुगाल संघ उंपात्यफेरीत स्थान मिळवण्यात अपयशी झाला आणि रोनाल्डोने डोळ्याच अश्रूच्या धारा घेऊन विश्वचषकाचा निरोप घेतला, तर मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विश्वचषकाआधी रोनाल्डो आणि मेस्सी यांचा बुद्धिबळ खेळतानाचा फोटो व्हायरल झाला, ज्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.
जेव्हा कोहली भरमैदानात रडला
विराट कोहली याच्यासाठी हे वर्ष खूप खास राहिले. कारण यावर्षी केवळ त्याने आपला फॉर्मच नाहीतर आपला शतकांचा दुष्काळ संपवला. मात्र, अफगणिस्तान विरुद्ध झळकावलेले शतक चाहत्यांसाठी जास्त भावनिक नव्हता. यावर्षी क्रिकेटमधील सर्वात भावनिक क्षण टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना बघायला मिळाला. या सामन्यात विराट कोहली याने एक हारलेला सामना भारताला जिंकून दिला होता. जेव्हा प्रत्येक भारतीय टीव्हीसमोर निराश होऊन बसलेला, प्रत्येकाला वाटत होते की हा सामना आपण हारलो आहोत, अशावेळी विराटने 53 चेंडूत 82 धावांची खेळी करत भारताला अविश्वसनीय विजय मिळवला होता. त्याची ही खेळी प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करणारी होती. जेव्हा आश्विनने विजयासाठी आवश्यक एक धाव घेतली तेव्हा विराटने वेगळ्या पद्धतीने जल्लोष केला. सामन्याच्या पुरस्कार प्रदान समारंभात विराटच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ज्या खेळाडूच्या निवडीवर लाखो लोकांनी अविश्वास दाखवला होता, त्याच खेळाडूने भारताची खिंड शेवटपर्यंत लढवली आणि संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला केले सिद्ध, यावर्षी लावली सामनावीर पुरस्कारांची रांग!
पत्रकाराने प्रश्न विचारताच बाबरला आला राग, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया