भारताचा संंघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघांमधील ३ सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेतील केपटाऊन येथे झालेला तिसरा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावत भारताने १-२ च्या फरकाने ही मालिकाही गमावली आहे. यानंतर १५ जानेवारी रोजी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने तडकाफडकी कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडण्याचा (Virat Kohli Step Down As Test Captain) निर्णय घेतला आहे.
त्याने आपल्या या निर्णयाची घोषणा करताना भलीमोठी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) याचे विशेष आभार मानले आहेत. याच धोनीमुळे एकेकाळी संघातून बाहेर होण्याची वेळ आलेल्या विराटची कारकिर्द पुढे (MS Dhoni Saved Virat Kohli Career) सावरली.
व्हिडिओ पाहा –विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
कोहलीला संघातून बाहेर करू इच्छित होते निवडकर्ते
धोनी त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळाडूंना बऱ्याच संधी उपलब्ध करून देत असे, मग तो खेळाडू विराट असो वा रोहित शर्मा. वर्ष २०१२ मध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटला संघ निवडकर्ते बाकावर बसवू इच्छित होते. परंतु धोनीने विराटवर विश्वास दाखवला आणि त्याला संघातून वगळू दिले नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने यासंदर्भात खुलासा (Virender Sehwag Reveals) केला आहे.
सेहवागने सांगितले की, २०१२ मध्ये जर निवडकर्त्यांचा निर्णय अंतिम राहिला असता तर विराटला कधीही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळायला मिळाले नसते. ऑस्ट्रेलियातील काही खराब खेळींमुळे विराटला संघातून नारळ देण्याच्या विचारात निवडकर्ते होते. विराटने त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त १०.७५ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तेव्हा धोनी कसोटी संघाचा कर्णधार होता, तर सेहवाग उपकर्णधार. या दोघांनी मिळूनच कोहलीची कसोटी संघातील जागा वाचवली होती.
याविषयी बोलताना सेहवाग म्हटला की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संघ निवडकर्ते विराटच्या जागी रोहितला खेळवू इच्छित होते. पण मी आणि कर्णधार धोनीने मिळून याबाबत निर्णय घेतला आणि कोहलीलाच खेळवले होते.
त्यावेळी मी कसोटी संघाचा उपकर्णधार होतो आणि धोनी संघाचे नेतृत्त्व करत होता. आम्ही दोघांनी विराटला पर्थ कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली होती आणि त्यानंतर जे झाले, तो पुढे इतिहास बनला. त्या सामन्यात विराटने पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात ७५ धावांची खेळी केली होती, असेही सेहवाग पुढे म्हणाला.
हेही वाचा- विराटने कसोटी कर्णधारपद सोडताना का घेतले धोनीचे नाव? नक्की काय ठरलं याला कारण?
धोनीमुळेच विराटला मिळाले कसोटीचे कर्णधारपद
पुढे याच धोनीने २०१४-१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ३० डिसेंबरला कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर जानेवारी २०१५ ला विराटला नियमित कसोटी कर्णधारपद मिळाले होते. त्याआधी त्याने त्याच दौऱ्यातील पहिल्या कसोटीत प्रभारी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्त्व केले होते. पहिल्या सामन्यात धोनी दुखापतीमुळे खेळला नव्हता.
तसेच धोनीने कसोटीतून निवृत्ती घेताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना असेही म्हटले होते की, माझ्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यास एक शिलेदार तयार आहे, म्हणून मी कसोटीतून निवृत्त होत आहे. तो शिलेदार अजून कोण नसून खुद्द विराट होता, असा एका मुलाखतीत शास्त्रींनी खुलासा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीला ‘सेंच्यूरी किंग’ न बनण्याचा नेहमीच राहणार मलाल! पाँटिंगच्या बड्या विक्रमांना मात्र ‘जीवनदान’
कर्णधार म्हणून कोहलीची कारकीर्द ‘विराट’च, पण त्याचे ‘हे’ वाद नेहमीच राहणार चर्चेत
विराटच्या उत्तराधिकारीचे नाव निश्चित, मग बीसीसीआय कधी करेल अधिकृत घोषणा? तारिख आली पुढे
हेही पाहा-