नागपुर | शेष भारत विरुद्ध विदर्भ इराणी ट्राॅफी स्पर्धेत विदर्भाने शेष भारत संघावर पाचव्या दिवशी पहिल्या डावाच्या आघाडीवर शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्या वर्षी ही ट्राॅफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.
या सामन्यात शेष भारताने पहिल्या डावात ३३० तर दुसऱ्या डावात ३ बाद ३७४वर आपला डाव घोषीत केला होता. विदर्भाने पहिल्या डावात ४२५ धावा करत ९५ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात विदर्भाला जिंकण्यासाठी २७९ धावांची गरज होती. परंतु १०३.१ षटकांत त्यांना ५ बाद २६९ धावांपर्यंतच मजल मारता आली. केवळ ११ धावांमुळे त्यांना सामन्यात विजय मिळवता आला नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीमुळे त्यांच्या नावावर ही ट्राॅफी झाली.
सलग दोन वर्ष रणजी ट्राॅफी आणि इराणी ट्राॅफी जिंकणारा विदर्भ यामुळे तिसराच संघ ठरला. यापुर्वी अशी कामगिरी केवळ मुंबई आणि कर्नाटक संघालाच करता आली आहे.
“आम्ही बक्षीसाची रक्कम पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबीयांना देणार आहोत. आमच्याकडून ही एक छोटीशी मदत असेल.” असे यावेळी विदर्भाचा कर्णधार फैज फजल म्हणाला.
इराणी ट्राॅफी विजेत्या संघाला १० लाख रुपयांचे बक्षीस बीसीसीआयकडून मिळते. विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्ष हे विजेतेपद जिंकताना मोठा इतिहास घडवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–केएल राहुलची निवड करताना अजिंक्य रहाणेवर अन्याय? वाचा
–टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
–पंतचा समावेश योग्य का? धोनी, कार्तिक व पंतची गेल्या एक वर्षातील कामगिरी पहाच