मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरी आणि शेवटची लढत सुरू आहे. या सामन्यातून भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली याचे पुनरागमन झाले आहे. कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान तो विश्रांतीवर होता. त्यानंतर मुंबईतील कसोटीतून संघात पुनरागमन करताच त्याच्या हाती नेतृत्त्वाच्या सूत्रे देण्यात आली. यासह विराटच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट हा भारतात सर्वाधिक कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा अव्वल कर्णधार बनला आहे. हा त्याचा कर्णधार म्हणून भारतातील ३१ वा सामना आहे. यापूर्वी तो ३० कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व करत माजी कर्णधार एमएस धोनीसोबत बरोबरीवर होता. परंतु मुंबई कसोटीत नाणेफेक करताच त्याने धोनीला मागे सोडले आहे. त्यामुळे आता धोनी ३० कसोटी सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
विराट आणि धोनीबरोबर या यादीत माजी भारतीय कसोटीपटू सुनिल गावसकर यांचेही नाव आहे. त्यांनी भारतात २९ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यांच्यानंतर मन्सूर अली खान पतौडी आणि सौरव गांगुली यांचाही या यादीत समावेश आहे.
कर्णधार म्हणून भारतात सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटर:
३१* – विराट कोहली
३० – एमएस धोनी
२९ – सुनील गावस्कर
२७ – मन्सुर अली खान पतौडी
२१ – सौरव गांगुली
परंतु दुर्दैवाची बाब अशी की, विराट या सामन्यात विशेष फलंदाजी करू शकला नाही. ८० धावांवर २ मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर विराट फलंदाजीला आला होता. परंतु तो जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीला २९.६ षटकात अजान पटेलने पायचित केले. यावर कोहलीने लगेचच रिव्ह्यू घेतला. यावेळी चेंडू त्याच्या पायाला आधी लागला की बॅटला, हे समजत नव्हते. तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. त्यामुळे विराटला शून्यावर माघारी परतावे लागले आहे.
या निराशाजनक सुरुवातीलानंतर विराट दुसऱ्या डावात चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यावर भर देईल. त्यामुळे पुढील डावात विराटचे जुने रूप पाहायला मिळते की नाही, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ: दुसर्या कसोटी सामन्यातील भारताच्या ‘या’ शिलेदाराबद्दल माहितीये का? पराक्रम वाचून शॉक व्हाल
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजाची बॅट ओकतेय आग!! कसोटीत झळकावले वनडे स्टाईल अर्धशतक