भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला 7 जून पासून सुरुवात होईल. या सामन्यामध्ये चाहत्यांच्या नजरा सर्वांत जास्त विराट कोहलीवर खिळून राहतील. कारण विराट, हा गेम चेंजर आहे आणि त्याची खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकते. एवढेच नाही तर कोहलीलाही मोठी खेळी खेळून इतिहास रचण्याची संधी मिळू शकते.
जागतिक कसोटी अजिंक्यपदावेळी विराटने उत्तम धावा बनवल्या तर हा अंतिम सामना संघाच्या नावावर होईल. तसेच, विराट कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू बनू शकतो. हा टप्पा गाठण्यासाठी विराटला 21 धावांची गरज आहे. या यादीमध्ये विराटपूर्वी सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, द्रविड आणि पुजारा हे चार खेळाडू आहेत. यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2000 हून अधिक धावा केल्या आहेत.
या सामन्यात विराटला आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावी करू शकतो. जर विराटने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (World Test Championship) अंतिम सामन्यामध्ये 55 पेक्षा जास्त धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 5000 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनू शकतो. कोहलीपूर्वी केवळ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा केल्या आहेत.
विराट उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे
भारतीय संघाला (Team India) विराटकडून मोठी इनिंग खेळण्याची अपेक्षा आहे कारण तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात विराटने 600 हून अधिक धावा केल्या. आरसीबीचा संघ शेवटपर्यंत प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिला.
कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरात विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही विराटने शानदार शतक झळकावले. विराटची आणखी एक चांगली खेळी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपदामध्ये चॅम्पियन बनवू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?