आशिया चषक 2023 अवघ्या काही दिवसांवर यावून ठेपला आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ 2 सप्टेंबरला आमने-सामने असतील. या महासामन्यावर अनेक क्रिकेटप्रेमी अणि खेळाडू आपली प्रतिक्रीया देत आहेत. अशातच पाकिस्तान संघाचे महान माजी गोलंदाज वसीम अक्रम यांनी आशिया चषकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाले की, “विश्वचषकापूर्वी आशिया चषक ही 50 षटकांच्या फॉर्मेटमधील गोलंदाजांची खरी परीक्षा असेल. कारण आशिया चषक स्पर्धेचे आयोजन उपखंडात होत आहे. कोणता गोलंदाज 10 षटके टाकू शकतो याची चाचणी सर्व संघांना आवडेल. कारण भारत, पाकिस्तान किंवा श्रीलंका सर्वांकडे गोलंदाज आहेत पण 10 षटके करणे फार महत्वाचे आहे. कारण सध्या गोलंदाजांना फक्त चार षटके टाकण्याची सवय लागली आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी तयारीसाठी आशिया चषक ही चांगली संधी आहे. यामध्ये गोलंदाजांचा चांगलाच सराव देखिल होईल.”
अक्रम यांनी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून कोणत्याही एका संघाचे नाव देण्यास नकार दिला. मात्र, ते म्हणाले की, “गेल्या वर्षी आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याबद्दल बोललो होतो. पण अंतिम सामना श्रीलंकेने जिंकला, तर भारताला अंतिमफेरी गाठता आली नाही. अशा परिस्थितीत या स्पर्धेतही कोणाचाही मार्ग सोपा नाही, हे तिन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अक्रम म्हणाले की, “मला माहित आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खूप महत्त्वाचा आहे, अनेक लोक तो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. यावेळीही दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर श्रीलंका आणि बांगलादेशला कमी समजू नका” असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.
आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघांच्या निवडीबाबत पाकिस्तानचे माजी गोलंदाज पुढे म्हणाले की, दोन्ही संघांच्या निवडकर्त्यांनी संतुलित निवड केली आहे. मला वाटते की दोन्ही संघ नवीन खेळाडूंना संधी देत आहेत, त्यामुळे हा सामना मनोरंजक असेल.” असे अक्रम म्हणाले. (Wasim akram said who is winner of asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
पोलार्ड पॉवर अजून फुल! सलग 4 चेंडूवर ठोकले 100 मीटर पेक्षा जास्तचे षटकार, पाहा व्हिडिओ
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाच झालं अवघड काम, विश्वचषकापूर्वीच मॅक्सवेलला झाली दुखापत