देशांतर्गत क्रिकेटचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणारा वसीम जाफर गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. मीमद्वारे त्याची मतं मांडण्याची अनोखी शैली अनेकांच्या पसंतीस उतरेलेलीही पाहायला मिळते. पण जाफर याबरोबरच एक चांगला फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना मुंबई आणि विदर्भ संघांना खेळाडू म्हणून रणजी ट्रॉफीही जिंकून दिली आहे. इतकंच नाही, तर मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरने घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती.
त्याशिवाय भारतीय संघव्यतिरिक्त त्याने मुंबई, विदर्भ, पश्चिम विभाग आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे प्रतिनिधित्व केले होते. आज(१६ फेब्रुवारी) त्याचा 45वा वाढदिवस त्यामुळे त्याच्या कारकिर्दीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ.
रणजी करंडकमध्ये संस्मरणीय कामगिरी
घरगुती क्रिकेटमधील विशेषतः रणजी करंडक स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे तो ओळखला जातो. रणजी स्पर्धेत वसीम जाफरने 12038 धावा केल्या आहेत, जो एक विक्रम आहे. त्याच्याशिवाय कोणालाच रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एवढ्या धावा करता आलेल्या नाही. त्यानंतर अमोल मजुमदारचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने 9202 इतक्या धावा केल्या आहेत.
मुंबईतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा वसीम जाफर 2015-16 च्या हंगामापूर्वी विदर्भ संघात दाखल झाला आणि सलग 2048 आणि 2019 मध्ये विदर्भाला त्याने विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
वेस्ट इंडिजमध्ये दुहेरी शतक
जाफर याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटीत पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे आपला पहिला एकदिवसीय सामना देखील याच संघाविरोधात खेळला होता. हा सलामीवीर फलंदाज काही अशा भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील आहे, ज्यांनी कॅरेबियन बेटांवर दुहेरी शतक झळकावले होते आणि हे द्विशतक त्याने सेंट लुसियामध्ये वेस्ट इंडिजसंघाविरुद्ध 212 धावा काढून केले होते.
प्रथम श्रेणीच्या दुसऱ्या सामन्यात त्रिशतक
जाफरला प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह मानले जाते. त्याने 200 सामन्यांच्या 421 प्रथम श्रेणीत एकूण 19410 धावा काढल्या आहेत ज्यात 57 शतकं आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 314 इतकी आहे. या धावा त्याने आपल्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये हजाराहून अधिक धावा
वसीम जाफरने 2000 ते 2018 दरम्यान भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या. यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने 2 एकदिवसीय सामने देखील खेळलेले आहेत.
जाफरच्या नेतृत्वाखाली मुंबईला दोन वेळा रणजी करंडकामध्ये कर्णधारपद
जाफरच्या नेतृत्वाखाली मुंबईला 2008-09 आणि 2009-10 ह्यादोन्ही वेळी रणजी करंडकामध्ये विजय मिळाला होता.
आयपीएलमध्ये प्रशिक्षक
जाफरने किंग्ज इलेव्हन पंजाबचे फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याने 2019 साली ही जबाबदारी स्विकारली होती, तर तो 2021आयपीएलपर्यंत या पदावर कायम होता.
उत्तराखंडचे प्रशिक्षिक, मग सोडले पद
निवृत्तीनंतर वसीम जाफर उत्तरखंड संघाचा प्रशिक्षक बनला, परंतु या खेळात धार्मिक प्रचार केल्याचा आरोप त्याच्यावर लागल्याने त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे सर्व आरोप त्याने फेटाळून लावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
वेगवान गोलंदाजांचा कारखाना! पीएसएलमध्ये पाच विकेट्स घेत युवा खेळाडूने ठोठावले पाकिस्तान संघाचे दरवाजे