भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यावर्षी आपली शेवटची आयपीएल खेळत आहे, असे अनेकांचे मत आहे. धोनीच्या नेतृत्वातीत चेन्नई सुपर किंग्ज क्लॉलिफायर एकमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध जिंकली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. या कामगिरीसाठी चाहत्यांकडून धोनीचे कौतुक होत असले, तरी रविंद्र जडेजा सोबतचा त्याचा वादही चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी (23 मे) गुजरात टायटन्सला पराभूत केल्यानंतर धोनीने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी धोनीने दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे जडेजा आणि त्याच्यातील वादाच्या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम लागला.
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) मॅच प्रजेंटेशनवेळी बोलला. तो म्हणाला की, “आम्हाला आधी गोलंदाजी करायची होती. गुजरात टायटन्स लक्ष्याचा पाठलाग करण्यात माहीर आहे. पण आता मी म्हणू सकतो की नाणेफेक गमावणे फायद्याचे ठरले. आम्हाला मैदानत पडणाऱ्या दवाचीही चिंता होती. शेवटच्या काही षटकांमध्ये तसे झालेही. पण मधल्या षटकांमध्ये सुधारणतः अर्धा तास खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता.”
पुढे बोलताना धोनीने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचेही कौतुक केले. तो म्हणाला, “खेळपट्टीवर फायदा मिळत असल्यावर जडेजा कमाल करतोच. अशा परिस्थितीत त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे कठीण असते. जडेजाने आजच्या परिस्थितीचा पूर्ण फायदा उचलला.” दरम्यान, जडेजाचे या सामन्यातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने 4 षटकांमध्ये 18 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. फिनिशर डेविड मिलर आणि दासुन शनाका यांच्या विकेट्स जडेजाने घेतल्या. सोबतच हार्दिक पंड्याचा झेलही जडेजानेच घेतला. धोनीने यावेळी जडेजाच्या फलंदाजीचेही कौतुक केले. धोनी म्हटल्या प्रमाणे जडेजा आणि मोईन अली यांची भागीदारी विसरून चालणार नाही.
दरम्यान, धोनीने गुजरातविरुद्धचा क्लॉलिफायर सामना जिंकल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया चाहत्यांची चिंता कमी करणारी ठरली. कारण जडेजा आणि धोनीतील वाद हा सीएसकेच्या चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक ठरू शकतो. मागच्या काही दिवसांपासून या वादाच्या चर्चा आणि बातम्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सोबत जडेजाने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या काही पोस्टही या वादाला हवा देणाऱ्या ठरत होत्या. असे असले तरी, धोनीच्या वक्तव्यावरून दोघांमधील संबंध आधी होते तसेच आताही आहेत, हे दिसून येते.
क्वॉलिफायन जिंकल्यानंतर सीएसके अंतिम सामन्यात जाणारा पहिला संघ ठरला. पराभवानंतर गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात पोहोचण्याची अजून एक संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटर सामना बुधवारी (24 मे) खेळला जाणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ गुजरात टायटन्सविरुद्ध क्लॉलिफायर दोन खेळेल. तर पराभूत होणारा संघ प्लेऑफमधून बाहेर होईल. (While Dhoni and Jadeja’s controversy was being talked about, the CSK captain praised Jadeja)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मुंबई आधी डेक्कन चार्जर्सने नेतृत्व करण्याची संधी दिली”, रोहितने केला मोठा खुलासा
सीएसकेची जोडी जबरदस्त! ऋतु-कॉनवेचे दोनच हंगामात अनेक विक्रमांवर ‘राज’