मुंबई । वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध साऊथॅम्प्टन मधील पहिली कसोटी चार विकेट्सने जिंकली होती. पण वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या दुसर्या आणि तिसर्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे इंग्लंडने विस्डेन करंडकावर नाव कोरले. वेस्ट इंडीजच्या या पराभवावर माजी दिग्गज गोलंदाज कर्टनी वॉल्श यांनी भाष्य केले आहे.
वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श म्हणाले की, “दुसर्या आणि तिसर्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देऊन वेस्ट इंडिजने चूक केली. पहिली कसोटी जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने ‘डिफेन्सिव’ खेळण्याचा प्रयत्न केला आणि मालिका गमावली.”
वॉल्श यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, “ते बहुधा असा विचार करीत होते की आम्ही 1-0 च्या पुढे आहोत, चला ‘डिफेन्सिव्ह’ पणे खेळू आणि पुढील दोन कसोटींमध्ये पराभव टाळण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं इथे त्यांनी ते केलं जे इंग्लंडला हवे होते.”
वेस्ट इंडिजकडून खेळताना 132 कसोटी सामन्यांत 519 विकेट्स घेणारे वॉल्श म्हणाले, “दोनदा नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी केली नाही, हा एक चांगला प्रश्न आहे, ज्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. मला वाटते की कदाचित यामुळचे आम्ही मालिका गमावली.”
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला पुनरागमन करण्याचे श्रेय वॉल्श यांनी दिले. ते म्हणाले, “आपण इंग्लंडलाही श्रेय द्यायलाच पाहिजे. तो संघ उत्तम क्रिकेट खेळला. त्याच्याकडे काही उच्च स्तरीय गोलंदाज आहेत. दुसर्या कसोटीत स्वत: ला सिद्ध करण्याच्या उद्देशाने ब्रॉड मैदानात उतरला आणि नंतर ही लय कायम ठेवली. एकदा तो लयीत आल्यानंतर इंग्लंडने वर्चस्व राखले.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा हा ‘दिग्गज’ म्हणतो, स्टुअर्ट ब्रॉडच्या पायांमध्ये आहे स्प्रिंग
हार्दिक पंड्या झाला बाबा; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गुडन्यूज
शेन वॉर्न म्हणतो, ‘हा’ खेळाडू करिअरच्या शेवटपर्यंत घेईल ७०० कसोटी विकेट्स
ट्रेंडिंग लेख –
-या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…
-आयपीएल २०२० मध्ये हे ५ मोठे विक्रम मोडण्याची शक्यता…
-क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’