आयपीएलच्या गोंगाटानंतर भारतीय खेळाडूंनी एकत्र येऊन खेळायची वेळ आली आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत पुढच्या महिन्यात 18 जून ते 22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळण्यात येणार आहेत. या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये 20 मुख्य खेळाडू तर 4 राखीव खेळाडू आहेत. हा अंतिम सामना अनेक दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा सामना असमार आहे.
भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर संघाला अंतिम सामन्यात खेळायला मिळत आहे. कोरोनामूळे आयसीसीने अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टक्केवारीची निवड केली. तरीदेखील भारताने उत्कृष्टरित्या प्रदर्शन करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताच्या अनेक खेळाडूंनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाला अंतिम सामन्यात पोहोवचले. त्यातीलच आतापर्यंत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा आम्ही येथे आढावा घेतला आहे. चला तर बघूया…
3) विराट कोहली (877 धावा)
भारतासाठी सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज म्हणून विराट कोहलीला ओळखले जाते. विराटने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली. मागील काही काळापासून विराट कोहलीची मोठी आकडी खेळी पाहण्यास मिळाली नाही. परंतू कठीण काळात विराटने आपल्या संघासाठी धावा बनवल्या. विराटने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 14 कसोटी मध्ये 22 सामन्यात 43.84 च्या सरासरीने 877 धावा काढल्या. यासह तो भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे.
2) रोहित शर्मा (1030 धावा)
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रोहित शर्माने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. या खेळाडूने आपली जबाबदारी ओळखून फलंदाजी करत संघासाठी धावा बनवल्या. भारत अंतिम सामन्यात पोहचण्यामागे रोहित शर्माचे महत्वाचे योगदान राहिले आहे. रोहितने सलामीला फलंदाजी करत बऱ्याच सामन्याच संघाला उत्कृष्ट सुरुवात करुन दिली. भारतासाठी जलद धावा करून सामना संघाकडे वळवण्यासाठी मदत केली. रोहितने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळताना सरासरी 64.37 ने 1030 धावा केल्या.
1) अजिंक्य रहाणे (1095 धावा)
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. रहाणेनी भारतासाठी या स्पर्धेत नियमित धावा बनवल्या आहेत. त्याच्या फलंदाजीने अनेक मोठ्या धावा पाहण्यास मिळाल्या. परदेशात देखील रहाणेची भूमिका सर्वोत्तम ठरली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताच्या उत्तम प्रदर्शनासाठी रहाणेने उत्कृष्ठ फलंदाजी करणे गरजेचे आहे. या खेळाडूने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 17 सामन्यातील 28 डावात फलंदाजी करताना 1095 धावा बनवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्म नव्हे तर ‘ही’ गोष्ट नडली, भूवीची इंग्लंड दौऱ्यावर निवड न होण्यामागचे कारण आले पुढे
Video: रिषभ काहीही करू शकतो! घरी असलेला पंत फिट राहण्यासाठी चक्क काढतोय लॉनमधील गवत