नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ३५३ धावांची मोठी आघाडी आहे.
कालच्या २ बाद १२४ वरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या भारताने आतापर्यंत ५४.२ षटकांत १८५ धावा केल्या आहेत.
या डावात चेतेश्वर पुजाराने १५२ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या आहेत. हे त्याचे कसोटीतील १८वे अर्धशतक आहे तर विराट कोहलीने ८२ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील १९वे अर्धशतक आहे.
इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामन्यात दोन्ही डावात ५०पेक्षा अधिक धावा करणारा विराट पहिला भारतीय ठरला आहे. तसेच कारकिर्दीत ५व्यांदा कर्णधार असताना विराटने दोन्ही डावात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती