भारत आणि इंग्लंड यांच्यात काही दिवसांपूर्वी ५ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. संपूर्ण मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांच्या विराेधात स्लेजिंगचे प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. मालिकेतील लाॅर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमधील संघर्ष समोर आला होता. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि जेम्स अँडरसन यांच्यातील वाद सर्वांना पाहायला मिळाला होता.
त्याच्यात झालेल्या वादामध्ये जेम्स अँडरसन बुमराहला काहीतरी बोलताना दिसला होता. पण तो काय म्हणाला होता? हे अध्याप समोर आले नव्हते. मात्र भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुर याने आता या घटनेचा खुलासा केला आहे.
शार्दुलने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले की, “आम्ही अँडरसनवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होतो. लाॅर्ड्स कसोटी दरम्यान जे काही घडले होते, तो ओव्हलमध्येही दिसले होते. मला नंतर सांगितले गेले की, अँडरसन बुमराहला काहीतरी म्हटला, जे त्याने करायला नको होते. मला सांगितले गेले होते की, त्याने बुमराहला शिवी दिली होती, जी सर्वांसमोर सांगितलेही जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू त्या घटनेनंतर आक्रमक झाले आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांच्याच पद्धतीत उत्तर दिले होते.”
अँडरसन लाॅर्ड्स कसोटीमध्ये बुमराहच्या बाउंसरमुळे हैराण झाला होता. पुढे जेव्हा बुमराह फलंदाजीसाठी आला होता तेव्हा इंग्लंडच्याही गोलंदाजांनी शाॅर्ट पिच चेंडूंनी त्याला लक्ष्य केले होते. मात्र, बुमराह आणि मोहम्मद शमीने इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान चांगल्याच प्रकारे पार केले होते.
शार्दुलने याबद्दल पुढे सांगितले की, “जेव्हा आम्ही विदेशात जातो, तेव्हा आपल्या खालच्या फळीतील फलंदाजांना बाउंसर्सचा सामना करावा लागतो. ऑस्ट्रेलियामध्ये नटराजनला मिचेल स्टार्क आणि पॅट कमिंस यांनी बाउंसर्स टाकले होते. कारण त्यांना माहीत होते की, या व्यक्तीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही जास्त फलंदाजी केलेली नाही. तर मग विराधी संघाचे टेलेंडर्स फलंदाजी करण्यासाठी समोर येतात, तेव्हा आम्ही त्यांना बाउंसर का टाकायचे नाहीत? आम्ही का बाउंसर गोलंदाजी करायची नाही? आम्ही कोणाला खुश करण्यासाठी खेळत नाहीत. आम्हीही विदेशात जिंकण्यासाठीच जातो.”
भारतीय संघ मालिकेत आघाडीवर
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडला कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मात दिली आहे. मालिकेतील लाॅर्ड्स स्टेडियमवर खेळला गेलेला दुसरा सामना १५१ धावांनी भारतीय संघाने जिंकला होता. मात्र, मालिकेतील हेडिंग्लेवरील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने पुन्हा ओव्हल स्टेडियमवरील चौथा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मालिका कोणत्या संघाने जिंकली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आयसीसी यावर लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रोहितला उपकर्णधारपदावरुन काढून टाका’, वाचा कर्णधार कोहली घेणार होता रोहितची विकेट?
टी२० क्रिकेटमध्ये धोनीनंतर कोहलीच आहे ‘कॅप्टनकूल’, भारताला जिंकून दिलेत भरपूर सामने