भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची सुवर्णसंधी होती. परंतु पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने असे काही कृत्य केले होते, जे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला आवडले नाही.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच घाम काढला होता. या दरम्यान जेव्हा मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टोला बाद केले होते, तेव्हा सिराजने सेलिब्रेशन म्हणून बेअरस्टोकडे पाहून तोंडावर बोट ठेवत त्याला जणू शांत बसण्याचा इशारा केला होता. ही कृती दिनेश कार्तिकला आवडली नाही. त्याच्या मते, सिराजला असे काही करण्याची आवश्यकता नव्हती.
या मालिकेत समालोचन करत असलेल्या दिनेश कार्तिकने द टेलीग्राफमध्ये लिहिले की, “मला असे वाटते की, सिराजने फलंदाजाला बाद केल्यानंतर तोंडावर बोट ठेवल्याचा इशारा करायची गरज नव्हती. तुम्ही त्याला आधीच बाद केले आहे. मग बाद केल्यानंतर असा इशारा करण्याची गरज काय? सिराजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा पहिला धडा आहे. भविष्यात त्याला या गोष्टी समजतील.”
तसेच तो पुढे म्हणाला की,” आपल्यापैकी किती लोकांना असे वाटले की, विराट कोहली पुढे येईल आणि आपल्या उत्साही खेळाडूला शांत करेल? ट्रेंट ब्रिज कसोटीत विराटला हे सुनिश्चित करायचे होते की, मोहम्मद सिराज आपल्या मर्यादा ओलांडणार नाही. हा संघ ज्याप्रकारे क्रिकेट खेळतो आहे, ते मला खूप आवडते. सिराज आणि केएल राहुल प्रमाणे संघातील इतर खेळाडू देखील विरोधी संघासोबत वाद घालताना मागचा पुढचा विचार करत नाहीत. हा नवीन युगाचा भारत आहे.”(Dinesh Karthik says mohammad siraj shushing Jonny Bairstow was unnecessary he will learn from this)
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या स्पर्धेत दिनेश कार्तिक देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. त्याने म्हटले की, “आक्रमकता ही वेगवेगळ्या प्रकारे दाखवता येऊ शकते. विराट, सिराज आणि राहुल सारखे असे काही खेळाडू आहेत जे तोंडावर उत्तर देण्यात सक्षम आहेत. परंतु मी वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना असे करताना पाहिले नाही. याचा अर्थ असा नाही की ते आक्रमक नाहीत. भारतीय गोलंदाज त्यांची आक्रमकता त्यांच्या गोलंदाजीमधून दाखवत असतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुलीसोबत चर्चा करत असलेले ‘ते’ व्यक्ती कोण? आहे ‘हे’ खास नाते