भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. मात्र, भारतीय संघाने खेळाच्या तिन्ही विभागात श्रीलंकेला 91 धावांनी मात देत सामना खिशात घालत वर्षातील पहिला मालिका विजय मिळवला. मात्र, या मालिकेतून टी20 पदार्पण केलेल्या शुबमन गिल याची कामगिरी संमिश्र ठरली. त्यानंतरही भारताचा माजी सलामीवीर व समालोचक आकाश चोप्रा याने त्याचे कौतुक केले आहे.
जवळपास चार वर्षांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या गिल याला या मालिकेत टी20 पदार्पणाची संधी मिळाली. मुंबई येथील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. पुणे येथील सामन्यातही त्याला केवळ 5 धावा बनवण्यात यश आलेले. मात्र, राजकोट येथील निर्णायक सामन्यात त्याने आपले कौशल्य दाखवले. त्याने या सामन्यात 36 चेंडूवर 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह 111 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
त्याच्या या खेळीनंतर आकाश चोप्रा याने आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना त्याचे कौतुक केले. तो म्हणाला,
“शुबमनची खेळी पाहून असे वाटत होते की, तो ही संधी गमावू इच्छित नव्हता. कारण पहिल्या दोन सामन्यात त्याला चांगला खेळ दाखवता आला नव्हता. एका बाजूने इतर फलंदाज वेगवान फलंदाजी करताना त्याने योग्य फलंदाजी केली. सूर्यकुमार ज्या फॉर्ममध्ये होता, त्यामुळे शुबमनवरील दबाव नक्कीच कमी झाला.”
शुबमन मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. वनडे व कसोटी संघातील जागा त्याने कमावली असली तरी, टी20 संघात जागा मिळवण्यात त्याला अपयश आलेले.
(Aakash Chopra Talk About Shubman Gill Inning In Rajkot T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम