‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने गतवर्षीच्या नोव्हेंबर महीन्यामध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे यानंतर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील (आयपीएल) राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबद्दल अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. पण आता निवृत्तीबद्दल उघडपणे चर्चा केली आहे.
तसेच त्याने क्रिकेटसोबत जोडून रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि कदाचित त्याला प्रशिक्षक म्हणून आरसीबीशी जोडण्याची इच्छा आहे.
डिव्हिलियर्सने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “क्रिकेट नेहमीच मला आनंद देणारा खेळ आहे. पण आयपीएल दरम्यान बराच काळ मला माझ्या कुटूंबापासुन लांब राहणं कठीण झालं होतं. दोन टप्प्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१ मध्ये माझ्या शरीरावर शारीरिक आणि मानसिक परिणाम झाला.”
आयपीएल २०२१ चे आयोजन दोन टप्प्यात करण्यात आले होते. पहिला टप्पा कोरोना व्हायरसच्या कारणाने तात्पुरता स्थगीत होण्यापुर्वी भारतात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा टप्पा युएईमध्ये पार पडला होता.
अधिक वाचा – विराट-एबीनंतर कोण असेल आरसीबीचा नवा कर्णधार ? धोनीच्या जुन्या सहकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर
‘मिस्टर ३६०’ पुढे म्हणाला की, “माझं खेळावर नेहमीच प्रेम आहे, ज्यामुळे मी खेळण्यासाठी आणि चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रवृत्त होतो. आत्ता पहील्यासारखे काही राहीले नाही, याची जाणीव जेव्हा मला झाली, तेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची हीच योग्य वेळ आहे, हे मला समजलं. त्यानंतर बराच विचार केल्यानंतर मी क्रिकेटला निरोप द्यायची घोषणा केली.”
डिव्हिलियर्सने म्हणाला की, ‘मी अशा ठिकाणी सापडलो, जिथे धावा काढणे आणि संघासाठी चांगली कामगिरी करणे हे त्याच्याबरोबर गेलेल्या प्रत्येक गोष्टींशी जुळत नव्हते. इथुनच संतुलन बिघडायला लागले आणि मला निवृत्ती घेण्याचा विचार आला. माझी क्षमता आणि माझ्या क्रिकेटमधील उर्जेचा पाठपुरवठा करण्यावर विश्वास ठेवणारा मी कधीही नव्हतो. मी आनंद मिळवण्यासाठी क्रिकेट खेळलो, पण ज्या प्रकारची खराब सुरुवात झाली, त्यावरुन मला समजलं की, माझ्यासाठी ही पुढे जाण्याची वेळ आहे.’
व्हिडिओ पाहा – क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन
डिव्हिलियर्सची कारकिर्द –
एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा, तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच १८४ आयपीएल सामन्यांत त्याने ५१६२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रवी शास्त्री बनले दक्षिण आफ्रिकेच्या पीटरसनचे फॅन; म्हणाले, लहानपणीच्या ‘या’ हिरोची झाली आठवण