टी२० विश्वचषक २०२१ चे सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यावेळी सर्वांची नजर भारतीय संघावर आहे. याची ३ प्रमुख कारणे म्हणजे विराट कोहली विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडेल. दुसरे म्हणजे माजी कर्णधार एमएस धोनीला संघाचा मेंटर बनवण्यात आले आहे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे २००७ पासून संघाने टी२० विश्वचषक विजेतेपद पटकावले नाही. २४ ऑक्टोबर रोजी संघाला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
भारतीय संघाची टी२० क्रिकेटमधील कामगिरी अप्रतिम राहिली असून, संघाने १३ देशाविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु, कोणत्याही संघाने भारताविरुद्ध ५० टक्क्यांपेक्षा जास्त सामने जिंकले नाहीत. याचाच अर्थ भारताने सर्व विरोधी संघांवर वर्चस्व गाजवले आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ यूएईमध्ये होणाऱ्या विश्वचषकात ही कामगिरी कायम राखू इच्छितो.
गटातील सर्व संघांविरुद्ध वर्चस्व
टी२० विश्वचषक यावेळी सातव्यांदा आयोजित होत आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा भारतात खेळली जाणार होती. परंतु कोरोनामुळे स्पर्धेचे आयोजन ओमान आणि यूएईमध्ये करण्याचे निश्चित झाले. सर्व सुपर-१२ संघांचे सामने यूएईमध्ये होणार आहेत. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात सुपर-१२ फेरीपासून करणार आहे. गटात समाविष्ट भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा टी२० विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. इतर दोन संघांबाबतचा निर्णय पात्रता फेरीच्या सामन्यानंतर होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ८ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने ७ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध १६ सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने जिंकले असून बरोबरीत सुटलेल्या दोन सामन्यातही भारताने विजय मिळवला. याशिवाय, अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या दोन्ही सामन्यात भारताला विजय मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
धोनीच्या भविष्याबाबत भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य; म्हणाला…