भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. परंतु, शनिवारी(2 जानेवारी) एक नवीन वाद निर्माण झाला आहे. रोहित शर्मा आणि इतर चार भारतीय खेळाडूंवर कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भलेही भारताच्या पाच खेळाडूंवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे आणि त्यावर तपास केला जात आहे. मात्र बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की, ते या प्रकरणात भारतीय संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. बीसीसीआयचे म्हणने आहे की, भारतीय संघाकडून मेलबर्न कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाकडून भारतीय संघाला बदनाम करण्याचा आणि मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी तोडला होता नियम
यामध्ये ऑस्ट्रेलिया मीडियाकडून दावा केला जात आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी-20 मालिका सुरू असताना विराट आणि हार्दिक पंड्या यांनी कोरोना व्हायरस प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले होते. ऑस्ट्रेलियन बातमीपत्र द एज यांच्या बातमीनुसार 7 डिसेंबरला विराट कोहली आणि हार्दिक पंड्या हे सिडनीतील एका बेबी शॉपमध्ये गेले होते.
या शॉपमधून त्यांनी बाळासाठी खूप सार्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्याबरोबर या शॉपमध्ये काम करणार्या एका व्यक्तिसोबत फोटो काढला होता. त्यावेळी या दोघांनी मास्क न घालण्याची चूक केली होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याने द एज या बातमीपत्रा सोबत बोलताना सांगितले, “दोन खेळाडूंने शॉपमध्ये जाणे हे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आहे. या दोन खेळाडूंनी मास्क लावायला हवा होता. जो की त्यांनी लावला नव्हता. यावरून दिसून येते की भारतीय संघाच्या खेळाडूंनी नियमाचे उल्लंघन केले आहे.”
या दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच नियम मोडला नाही
तसेच एका आठवड्यांनंतर काही भारतीय खेळाडू ऍडलेड येथील एका वाॅफल एंड कॉफी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. जेथे भारतीय खेळाडूंनी आत बसण्याअगोदर आत जाऊन ऑर्डर दिली होती. या दरम्यान त्यांनी मास्क लावायला हवा होता मात्र त्यांनी मास्क लावला नव्हता.
ऑस्ट्रेलिया मीडियाने दावा केला आहे की, भारतीय खेळाडूंनी अगोदरही नियमाचे उल्लंघन केले होते. मात्र ती खूप छोटी गोष्ट होती म्हणून त्याचा रिपोर्ट दिला नव्हता. मात्र भारतीय संघाचे म्हणने आहे की, 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर त्यांना सामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांसारखी वागणूक द्यायला हवी.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीची मुलगी सनाने दिली त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली…
मयंक अगरवालच्या अपयशाचे कारण सांगत ‘या’ दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
मेलबर्न येथे होणारे भारतीय संघाचे सराव सत्र ‘या’ कारणामुळे झाले रद्द