भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या लवकर फॉर्ममध्ये आला नाही तर त्याची संघामधली जागा धोक्यात येऊ शकते. हार्दिकने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात अष्टपैलू खेळाडू म्हणून केली होती. पण सध्या फिटनेसमुळे तो गोलंदाजी करत नाही आणि संघात आता असा एक खेळाडू आला आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजीही करतोय. या खेळाडूंचं नाव आहे वेंकटेश अय्यर. त्याने असे सांगितले आहे की, तो जास्तीत जास्त षटकं टाकण्याचा प्रयत्न करेल आणि बळी घेण्याचा देखील प्रयत्न करेल.
मध्य प्रदेशच्या या क्रिकेटपटूला न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल २०२१ खेळल्यामुळे वेंकटेशला संघात जागा मिळाली. त्याने आयपीएलमध्ये ४१.११ च्या सरासरीने १० डावांत ३७० धावा केल्या होत्या.
तसं बघायला गेलं तर, त्याची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका एवढी खास नाही गेली कारण तो केवळ ३६ धावा करू शकला आणि एकदा गोलंदाजी केली. तरी वेंकटेशने दाखवून दिले आहे की, अष्टपैलू खेळाडू म्हणून तो संघासाठी पुढे उपयोगी ठरू शकतो.
जास्तीत जास्त षटकं टाकीन आणि बळी घेईन
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना वेंकटेश म्हणाला, “प्रत्येक क्षेत्रात योगदान देणं हे चांगलं असतं. मी एक अष्टपैलू खेळाडू आहे मला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींसाठी सदैव तयार राहायची गरज आहे. मला कुठल्याही मालिकेत सामील केलं तर मला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. जर मला निवडलं जातंय तर माझं कर्तव्य आहे की, सर्व विभागात चागलं प्रदर्शन करणं.”
त्याने सांगितलं की, “माझ्या वाटेला कुठलंही आव्हान आलं तरी मी त्याचा स्वीकार करेल. एक क्रिकेटपटू असल्याने मला प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावे लागणार. माझा कर्णधार बोलला गोलंदाजी कर तर मी जास्तीत जास्त षटकं टाकीन आणि बळी घेईन. जर तो म्हणाला फलंदाजी कर तरी देखील मी संघासाठी धावा जास्तीत जास्त बनवेल.”
मला संधी द्या, मी धावा करीन
त्याने पुढे असं पण सांगितलं की, “एक फलंदाज असल्यामुळे मला कोणत्याही स्थितीत फलंदाजी करता आली पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार देखील केलं आहे. मग सलामी फलंदाज म्हणून असो नाहीतर क्रमांक ४, ५ किंवा खालच्या फळीत असो मी धावा बनवणार. जेव्हा तुम्ही देशाचं प्रतिनिधीत्व करत असता तेव्हा संघाला हवं तसं खेळता आलं पाहिजे. संघाला नेहमी पहिले ठेवता आलं पाहिजे.”
भारताकडून खेळण्याचं एक स्वप्न होतं
आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेला त्याने ‘आठवणीत राहील’ असं संबोधले आहे. कारण टी-२० विश्वचषकातल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताने टी२० मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने हरवलं. वेंकटेश म्हणाला की, “ही मालिका माझ्यासाठी आठवणीत राहण्यासारखी होती. भारताकडून खेळणं माझं एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. आपल्या पहिल्याच मालिकेमध्ये ट्रॉफी जिंकणं आणि तेही पण ३-० या फरकाने. मी खूप आनंदी आहे.”
भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला याचाही त्याने खुलासा केला आहे. रोहितने मालिका विजयानंतर तरुण अय्यरच्या हातात ट्रॉफी दिली होती. वेंकटेश म्हणाला, “जिंकल्यानंतर जल्लोष साजरे करत असताना रोहितने मला ट्रॉफी दिली आणि म्हणाला चांगला खेळलास तू. जिंकलेली ट्रॉफी पकडणं माझ्यासाठी भावनापूर्ण आणि गर्वाचा क्षण होता. मला वरिष्ठ खेळाडू व कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल सर यांच्याकडून भरपूर पाठिंबा मिळाला. माझ्यासाठी तो क्षण खूप विशेष होता जेव्हा रोहितने मला ट्रॉफी दिली आणि मला भरपूर श्रेय दिलं. तो म्हणाला तू चांगला खेळलास आणि पुढे देखील असा खेळत रहा.”
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ, 1st Test, Live: भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, श्रेयस अय्यरचे झाले कसोटी पदार्पण
सिनेमाहून कमी नाही उन्मुक्त चंदची लव्हस्टोरी, विमानतळावर फिल्मी स्टाईलमध्ये सिमरनला केले होते प्रपोज
हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?